शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

कोरोना दक्षता समित्यांनी आता तरी सक्रिय व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदारांमार्फत ग्रामीण भागात ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांना शासनाने कारवाईचे ...

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदारांमार्फत ग्रामीण भागात ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांना शासनाने कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या समित्यांची अनेक ठिकाणी कारवाईच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्या केवळ नावापुरत्याच दिसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत चाललेला ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा विळखा कमी कसा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असताना गावाची धुरा सांभाळणारे ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे गावकऱ्यांना अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे नातेवाईक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, कोणीही दुश्मनी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. गावातील राजकारण व प्रत्यक्ष ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सोबत नसल्याने आपण कोणा कोणाची दुश्मनी घेणार, असा प्रश्न ग्राम समितीत असणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना पडत आहे. अनेक ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही, ही गंभीर बाब आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यातील काही गावात तर काही चौकात गप्पांचा फड रंगत असल्याचे दिसून येते.

-----------------------------

बाॅक्स

ग्रामीण भागातही हवी कडक कारवाई

शहरी भागात अनेक ठिकाणी पोलीस पथके तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून अनेकदा कारवाया होतात. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच किंबहुना शहरापेक्षा जास्त ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. आता ग्रामीण भागातही कडक कारवाई करण्याची गरज आहे. जोपर्यंत ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलीस पथकाद्वारे कडक कारवाई होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होणार नाही.