शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोरोनाने आठवडे बाजार बंद ; उलाढालीला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

वाशिम : ग्रामीण भागातील लोकांना स्वत:कडील वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आधार ठरलेले आठवडे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने ग्रामीण अर्थचक्राला टाळे ...

वाशिम : ग्रामीण भागातील लोकांना स्वत:कडील वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आधार ठरलेले आठवडे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने ग्रामीण अर्थचक्राला टाळे लागले आहे. अनेकांच्या उपजीविका सोबतच कितीतरी प्रश्न एकाच वेळी उभे ठाकले आहेत.

लहान वस्तूंपासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याचे आठवडे बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे. मात्र, कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने वर्षभरात दुसऱ्यांदा हे बाजार बंद झाले. तालुकास्तरीय बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती, शिवाय यावर अनेकांची उपजीविका होती. शेतातील माल विकण्याचा हा सोपा पर्याय देखील होता. भाजीपाला, अन्नधान्य विकायचे आणि याच पैशांतून दैनंदिन बाजारहाट करायची ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र, आठवडे बाजार भरण्यास मनाई केल्यामुळे नेहमीच लोकांनी गजबजणारे व आपले अर्थचक्र चालवित असलेले आठवडे बाजार बंद झाल्याने या बाजार परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर आठवडे बाजार भरायला सुरुवात होत असतानाच ते पुन्हा बंद झाल्याने यावर अवलंबून असणारे अनेक जण हादरले. कारण वर्षभरापासून या संकटाने कोलमडलेले व्यवसाय आता कुठे स्थिरावला असताना, पुन्हा एकदा संकट उभे ठाकले. कठोर बंधने घातली जावी, पण काही नियम, अटी ठेवून आठवडे बाजाराला परवानगी द्यावी, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.