शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोरोनामुळे अनेकांनी बदलले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

शेलूबाजार : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात बदल झाले असून उदरनिर्वाहासाठी अनेकांनी परंपरागत व्यवसाय बदलून अन्य व्यवसायाची कास धरल्याचे शेलुबाजार परिसरात ...

शेलूबाजार : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात बदल झाले असून उदरनिर्वाहासाठी अनेकांनी परंपरागत व्यवसाय बदलून अन्य व्यवसायाची कास धरल्याचे शेलुबाजार परिसरात दिसून येत आहे.

गतवर्षात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन नंतर आता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने अनेकांची आस्थापने अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने बंद आहेत. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आली आहे. अशाच काही लघु व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवेत मोडणारे व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे दिसून येत

आहे. १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मागील ६ एप्रिलपासून इतर अनेक लघु व्यावसायिकांची प्रतिष्ठेने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. परिसरातील ४० खेड्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या शेलूबाजार बाजारपेठेत ग्रामीण भागातील अनेक युवकांनी भाड्याच्या दुकानात व्यवसाय सुरु केले होते. ते व्यवसाय सध्या बंद असल्याने खिशातून भाडे देण्याची वेळ येऊ नये म्हणून अनेकांनी आपले व्यवसाय बदलले आहेत. लक्ष्मण गावंडे या युवकाचे जनरल स्टोअर्स दुकान आहे मागील ६ एप्रिलपासून व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांनी आता भाजीपाल्याचे दुकान थाटले आहे. लक्ष्मणच नव्हेतर अनेक युवकांनी अत्यावश्यक सेवेत मोडणारे व्यवसाय ठिकठिकाणी रस्त्याचे कडेला सुरु करुन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय बंद पडले . या परिस्थितीमुळे खचून न जाता पुन्हा उभारी घेत कित्येक जणानी विविध व्यवसाय हाती घेतले आहे.