शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

समन्वयित कृषि विकास प्रकल्प ३१ डिसेंबरला येणार संपुष्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:55 IST

समन्वयित कृषि विकास प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबरला संपुष्टात येत असून झालेल्या कामांची प्रलंबित देयके, देणी देण्याकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी समन्वयित कृषि विकास प्रकल्पातून शेतीपयोगी विविध योजना राबविण्यात आल्या. दरम्यान, या प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबरला संपुष्टात येत असून झालेल्या कामांची प्रलंबित देयके, देणी देण्याकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये कृषि विकास साधण्यासाठी सन २००९ पासून महाराष्ट्र शासन पुरस्कृत, आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या सहाय्याने समन्वयित कृषि विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान उंचावणे, मृद व जलसंधारणाची विविध कामे करणे, सेंद्रिय शेती पद्धतीचा प्रसार करणे, शेतीपुरक जोडधंदे, कृषि मालावर प्रक्रिया व कृषि मालाची समुहाद्वारे विक्री, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालनास चालना देणे आदी उद्देश बाळगण्यात आले. असे असले तरी प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा खर्च होवूनही समन्वयित कृषि विकास प्रकल्पातून झालेली कामे म्हणावी तशी परिणामकारक ठरलेली नाहीत. अशातच आता ३१ डिसेंबरला हा प्रकल्पच संपुष्टात येणार असून त्यापूर्वी प्रलंबित देयके अदा करणे तथा आगामी दोन महिन्यात होऊ घातलेली कामे पूर्ण करण्यासाठी १२ आॅक्टोबर रोजी शासनाने ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी दर्शविली आहे.

समन्वयित कृषि विकास प्रकल्प येत्या ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. यामाध्यमातून गेल्या १० वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त सहाही जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात विविध स्वरूपातील कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.- महेश मिश्राजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, समन्वयित कृषिविकास प्रकल्प, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना