शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात काँग्रसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

उपविभागीय अधिका-यांना निवेदन.

कारंजालाड (जि. वाशिम) : केंद्रात व राज्यात असणार्‍या भाजपा सरकारचा निषेध करून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अल्पसंख्यांक तथा दलितांचे हित न साधता उद्योजकांना हे सरकार फायदे देत आहे. या धरणे आंदोलनात कमिटीने यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत करावी, सरसकट कर्ज माफ करावे, पूर्णपणे वीज बिल माफ करावे, केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादने कायद्यातील शेतकर्‍यावरील अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ५ रूपये किलो तांदूळ व १0 रूपये किलो गहू शासकीय दराने देण्यात येत होते ती योजना पूर्ववत करावी, रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, शेतमालाला उच्च दर्जाचा भाव देण्यात यावा, गुरांसाठी चारा डेपो उघडावेत तथा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.