शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

कारंजात काँग्रसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

उपविभागीय अधिका-यांना निवेदन.

कारंजालाड (जि. वाशिम) : केंद्रात व राज्यात असणार्‍या भाजपा सरकारचा निषेध करून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अल्पसंख्यांक तथा दलितांचे हित न साधता उद्योजकांना हे सरकार फायदे देत आहे. या धरणे आंदोलनात कमिटीने यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत करावी, सरसकट कर्ज माफ करावे, पूर्णपणे वीज बिल माफ करावे, केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादने कायद्यातील शेतकर्‍यावरील अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ५ रूपये किलो तांदूळ व १0 रूपये किलो गहू शासकीय दराने देण्यात येत होते ती योजना पूर्ववत करावी, रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, शेतमालाला उच्च दर्जाचा भाव देण्यात यावा, गुरांसाठी चारा डेपो उघडावेत तथा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.