शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

CoronaVirus : पुणे, मुंबईहून परतलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:19 IST

केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: मुंबई, पुणे या शहरांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने या महानगरात रोजगार किंवा नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहेत. या नागरिकांची माहिती पोलीस पाटलांकडून संकलित करण्यात येत आहे; परंतु गावातील किंवा नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी आवश्यक असताना त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला देण्यात आहे, तर जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी न करता तोंडी माहिती घेऊन परत पाठविले जात असल्याचा प्रकार शुक्र वारी उघडकीस आला.जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असतानाच मुंबई, पुणे यासारख्या शहरांतही या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील नोकरदार, कामगार परत येत आहेत. या लोकांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना अशा नागरिकांची संपूर्ण माहिती संकलित करून ती तालुका दंडाधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले, तसेच या नागरिकांनी स्वत: नजिकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी किंवा आरोग्य विभागाने त्यांची तेथेच तपासणी करून त्यांना पुढील १५ दिवस घरातच थांबण्याचा सल्ला द्यावा, अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. तथापि, माहिती संकलित करतानाच महारानगरातून आलेल्या काही नागरिकांना थेट जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात येत असून, जिल्हा रुग्णालयात मात्र तपासणी न करता केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामुळे स्थलांतरीत नागरिकांची तारांबळ उडत आहे. असा प्रकार मुंबई येथे नोकरी करणाºया आणि परत आलेल्या रिसोड तालुक्यातील अमोल रामदास सावसुंदर या २४ वर्षीय युवकासोबत घडला. त्याची माहिती घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले; परंतु तेथे केवळ तोंडी माहिती घेऊन त्याला परत पाठविण्यात आले. 

परजिल्ह्यातून परत येणाºया नागरिकांना नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात येत असून, या नागरिकांवर आरोग्य विभागाचे पूर्ण लक्षही आहे. त्यामुळे या नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येण्याची गरजच नाही. कोणती लक्षणे आढळून येत असतील, तरच अशा नागरिकांना जिल्हा रुग्णालयात बोलावून तपासणी केली जाईल.-अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक,वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम