शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

CoronaVirus : पुणे, मुंबईहून परतलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:19 IST

केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: मुंबई, पुणे या शहरांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने या महानगरात रोजगार किंवा नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहेत. या नागरिकांची माहिती पोलीस पाटलांकडून संकलित करण्यात येत आहे; परंतु गावातील किंवा नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी आवश्यक असताना त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला देण्यात आहे, तर जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी न करता तोंडी माहिती घेऊन परत पाठविले जात असल्याचा प्रकार शुक्र वारी उघडकीस आला.जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असतानाच मुंबई, पुणे यासारख्या शहरांतही या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील नोकरदार, कामगार परत येत आहेत. या लोकांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना अशा नागरिकांची संपूर्ण माहिती संकलित करून ती तालुका दंडाधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले, तसेच या नागरिकांनी स्वत: नजिकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी किंवा आरोग्य विभागाने त्यांची तेथेच तपासणी करून त्यांना पुढील १५ दिवस घरातच थांबण्याचा सल्ला द्यावा, अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. तथापि, माहिती संकलित करतानाच महारानगरातून आलेल्या काही नागरिकांना थेट जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात येत असून, जिल्हा रुग्णालयात मात्र तपासणी न करता केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामुळे स्थलांतरीत नागरिकांची तारांबळ उडत आहे. असा प्रकार मुंबई येथे नोकरी करणाºया आणि परत आलेल्या रिसोड तालुक्यातील अमोल रामदास सावसुंदर या २४ वर्षीय युवकासोबत घडला. त्याची माहिती घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले; परंतु तेथे केवळ तोंडी माहिती घेऊन त्याला परत पाठविण्यात आले. 

परजिल्ह्यातून परत येणाºया नागरिकांना नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात येत असून, या नागरिकांवर आरोग्य विभागाचे पूर्ण लक्षही आहे. त्यामुळे या नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येण्याची गरजच नाही. कोणती लक्षणे आढळून येत असतील, तरच अशा नागरिकांना जिल्हा रुग्णालयात बोलावून तपासणी केली जाईल.-अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक,वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम