शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:41 IST

दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके संकटात सापडली असून, दगड उमरा येथील १० शेतकºयांचे गहू पिक पाण्याअभावी सुकत असल्याने हे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.वाशिम जिल्ह्यात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस पडला. त्यात वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असताना दगड उमरा परिसरात वाशिम तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीला तुंडूब दिसणारे जलाशय आणि विहिरींची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. सुरुवातीच्या काळात पडलेल्या पावसाने जलाशय आणि विहिरींची पातळी वाढल्याचे पाहून दगड उमरा शिवारातील शेतकºयांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. त्यात हरभरा आणि गहू पिकाचे प्रमाण अधिक आहे. हरभरा पिकाला पाण्याची फारसी गरज नसल्याने हे पीक तरले; परंतु आता विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने गहू पिकाला पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांचे पीक अडचणीत आले आहे. त्यातच जनार्धन किसान पाठे, विठ्ठल निवृत्ती पाठे, शिवराम नामदेव पाठे, सतीश महादेव पाठे, संजय कुंडलिक पाठे, भागवत पाठे, प्रकाश दत्ता पाठे, निराकार माधव पाठे, नंदकिशोर पाठे, शांताबाई कुंभार या शेतकºयांचे गहू पिक, तर पाण्याअभावी सुकत चालले आहे. त्यामुळे या शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती