शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

खरीप, भाजीपाला पिकांवर शंखी गोगलगायीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

मानोरा तालुक्यात देवठाणा येथे नाला व आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन, कपाशी संत्रा भाजीपाला पिकाची रोपे आदी पिकांवर शंखी ...

मानोरा तालुक्यात देवठाणा येथे नाला व आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन, कपाशी संत्रा भाजीपाला पिकाची रोपे आदी पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याच्या अनुषंगाने २२ जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांचा तज्ज्ञ मार्गदर्शक या नात्याने समावेश असलेल्या समितीने देवठाणा येथे भेट देऊन महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी संत्रा भाजीपाला पिके यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पी. पाहणी करण्यात आली. या पी.पाहणी दरम्यान भेट दिलेल्या समितीला शंखी गोगलगाय सोयाबीन, संत्रा, भाजीपाला आदी पिकांची रात्रीच्या वेळेस पाने किंवा रोपाच्या बियाचे अंकूर खाऊन नुकसान करीत असल्याचे आढळून आले. विशेषत: गावालगत नाल्याच्या काठी असलेल्या शिवारातील पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आला. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी घोडेकर, कृषी पर्यवेक्षक जैताडे, आर. व्ही. सवने, कृषी सहायक डी. एस. खुडे, गजानन इडोळे, व्ही. पी. रणबावळे यांनी गाव-शिवाराच्या नालाकाठच्या परिसराची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

----------

शेतकरी चर्चासत्रातून व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

प्रक्षेत्र भेटीनंतर शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत चर्चासत्र घेण्यात आले. यात कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी शंखी गोगलगायची ओळख, अचानक शंखी गोगलगायीचा होणाऱ्या प्रादुर्भावाची कारणमिमांसा, नुकसानाचा प्रकार, तसेच सामूहिकरीत्या शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले, तसेच शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले. यावेळी, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार, प्रगतिशील शेतकरी सुनील जामदार, अनिल जामदार, उमेश जामदार, चंद्रकांत खराडे, पवन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

---------------

उपाय योजनांबाबत विस्तृत माहिती

सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील व बांधावरील गोगलगाय व त्यांची अंडी हाताने गोळा करून मिठाचे द्रावणात टाकून त्यांचा नाश करणे, घरचे खराब पोते किंवा बोंद्रे गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून रात्री शेताच्या बांधावर पाऊस नसताना ठेवणे, रात्री शेताच्या बांधावर सात ते आठ मीटर अंतरावर वाळलेल्या अर्धवट कुजलेल्या गवताचे किंवा टाकाऊ पदार्थांच्या अवशेषाचे ढीग ठेवून या ढिगावर गुळाच्या पाण्याचा शिडकावा देऊन सकाळी या कचऱ्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करणे आदी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

240721\24wsm_1_24072021_35.jpg

खरीप, भाजीपाला पिकांवर शंखी गोगलगायीचा हल्ला