शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

सिंचन प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण करा

By admin | Updated: December 16, 2015 01:52 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश; सौर कृषी पंपाचे लाभार्थी वाढविण्याच्या सूचना.

वाशिम: जिल्ह्यात भूसंपादनाअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक जमिनींच्या संपादनाची कार्यवाही डिसेंबरअखेरपर्यंंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील सभागृहात १५ डिसेंबर रोजी झालेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत त्यांनी सदर आदेश दिले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, व्ही. गिरीराज, सुजाता सैनिक, प्रभाकर देशमुख, अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, कृषी पंपांना वीज जोडणी, रस्ते, पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन, जलयुक्त शिवार अभियान आदी विषयांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील ४0 अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये भूसंपादन, वनजमिनीबाबतचे प्रश्न मार्गी लावणे, रस्ते व विद्युत वाहिन्यांच्या स्थानांतरणाची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करून प्रकल्पांचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवार अभियानामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने अतिरिक्त पायाभूत आराखडा (इन्फ्रा)-२ च्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन वीज जोडणीचे काम सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. मार्च २0१६ पर्यंत कृषी पंप वीज जोडणीचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. वीज जोडणीची कामे करण्यास दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर व ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.