शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. ...

वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २५ मे रोजी कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. तसेच तालुक्यात ग्रामस्तरीय विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने, नोडल अधिकारी डॉ. बढे, पोलीस निरीक्षक सतीश पाटील, धंदर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी तालुक्यातील कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, कोरोना नियमांची अंमलबजावणी आदींविषयी आढावा घेतला. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे गावपातळीवर शाळा, समाज मंदिर अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करावी. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. गावपातळीवर सुरू करण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षत घ्यावी. कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि तुळजा भवानी मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

०००

ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सध्या घट होत असली तरी भविष्यात हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. पोलिसांनी जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाचा ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश द्यावा. कोणत्याही व्यक्तीला ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी नाक्यावरच कोरोना चाचणी करावी. विवाह, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकरिता ग्रामस्तरीय समितीला आवश्यक सूचना द्याव्यात. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू असले तरी काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या आस्थापनाधारक, दुकानदार तसेच भाजीपाला, फळविक्रेते यांची प्रत्येक पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.