शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. ...

वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २५ मे रोजी कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. तसेच तालुक्यात ग्रामस्तरीय विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने, नोडल अधिकारी डॉ. बढे, पोलीस निरीक्षक सतीश पाटील, धंदर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी तालुक्यातील कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, कोरोना नियमांची अंमलबजावणी आदींविषयी आढावा घेतला. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे गावपातळीवर शाळा, समाज मंदिर अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करावी. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. गावपातळीवर सुरू करण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षत घ्यावी. कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि तुळजा भवानी मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

०००

ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सध्या घट होत असली तरी भविष्यात हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. पोलिसांनी जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाचा ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश द्यावा. कोणत्याही व्यक्तीला ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी नाक्यावरच कोरोना चाचणी करावी. विवाह, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकरिता ग्रामस्तरीय समितीला आवश्यक सूचना द्याव्यात. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू असले तरी काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या आस्थापनाधारक, दुकानदार तसेच भाजीपाला, फळविक्रेते यांची प्रत्येक पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.