शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण माहिती संकलित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी गठित करण्यात ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.पी. देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.जयश्री गुट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची उपस्थिती होती.

शण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाला आहे, अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तहसीलदारांना प्रस्ताव सादर करावा. ज्या अनाथ बालकांकडे वडिलांची शेती असेल, तर त्या बालकांची शेतीचा वारस म्हणून सातबारावर नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू पावलेल्या पालकांचा बँकेत असलेला पैसा त्या बालकांना मिळावा, यासाठीही वारस म्हणून त्या बालकांची नोंद घेण्यात यावी. दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना त्यांच्या पालकांच्या नावे असलेली चल व अचल संपत्ती संबंधित बालकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य व सक्षम बालकांच्या पालनपोषणकर्त्या व्यक्तीकडे ठेवण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

सभेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, चाइल्ड लाइनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी सर्वश्री. आलोक अग्रहरी, डी.पी.उचित, आर. एन. सुरजुसे, आर. जी. वानखडे यांची उपस्थिती होती.

००

अंगणवाडी सेविकेमार्फत सर्वेक्षण

कोविड १९ मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडीसेविकेमार्फत करण्यात आले. दोन पालक गमावलेली ५ बालके चार कुटुंबांत, तर एक पालक गमावलेले १८३ बालके ९४ कुटुंबांत आहेत. त्यापैकी ४४ बालकांची गृहभेट घेऊन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित १३९ बालकांची गृहभेट घेण्यात येत आहे. त्यांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले. आतापर्यंत ५८ बालकांचा सामाजिक अन्वेषण अहवाल चौकशी करून बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला.