शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण ; तूर पिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:45 IST

वाशिम: जिल्ह्यात शनिवार १ डिसेंबर रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले असून, या पिकावर किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शनिवार १ डिसेंबर रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले असून, या पिकावर किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका पिकांना बसत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पाऊसही पडला. यामुळे तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळून पडला. तर त्यानंतर धुके पडण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ३०० हेक्टर क्षेत्रातील तुरीचे पीक कोमेजून शेतकºयांचे नुकसान झाले. या संकटातून शेतकरी सावरत असतानाच शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे शेंगावर किडींचा प्रादूर्भाव वाढण्यासह फुलोरा गळून पुन्हा शेतकºयांचे नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा ५९६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली असून, सध्या निम्म्याहून अधिक क्षेत्रातील पिकाला शेंगाही आल्या आहेत. अशात ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादूर्भाव झाल्यास उत्पादनात घट येण्यास मालाचा दर्जाही खालावण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती