शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली

By admin | Updated: November 16, 2014 01:52 IST

वाशिम शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतोय: कर्तव्यावरील कर्मचा-यांना चौक्यांची अँलर्जी, प्रशासनाचे दुर्लक्ष.

नागेश घोपे/वाशिम

       महाराष्ट्राच्या नकाशावर संवेदनशील म्हणून लालबत्तीत टिमटिमणार्‍या वाशिम शहरातील पोलिस चौक्या आजमितीला चक्क बुजगावणे बनल्या आहेत.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष तथा कार्यरत बीट जमादारांना झालेल्या ह्यअँलर्जीह्णमुळे सदर चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेवरील पोलिसांची पकड सैल झाली असून, शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. शिवाजी चौकातील पोलिस चौकी वगळता इतर चौक्या अपवादानेच उघडल्या जातात. एवढेच नव्हे तर येथे कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी या चौक्यांकडे ढुंकुणही पाहत नसल्याचे सर्वश्रृत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सौदागरपुरा, लाखाळा व क्रांती चौकातील पोलिस चौकीचे अस्तित्वच नामशेष झाले आहे. इतर चौक्याही सद्यस्थितीत शेवटचे आचके देत आहेत.

बसस्थानकावर पोलिस चौकीच नाही!

 स्थानिक बसस्थानकावर अद्याप पोलिस चौकी उभारण्यात आलेली नाही. परिणामी, येथे दिवसागणिक चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. शहर पोलिस स्टेशन प्रशासनाकडून येथे दररोज दोन पोलिसांची ड्युटी लावण्यात येत असते; परंतु सदर पोलिसांना बसण्यासाठी येथे चौकीच नसल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

*जिल्हा रूग्णालयातील चौकी बेवारस

 स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने येथे पोलिस चौकी निर्माण केली आहे. या चौकीवर काही पोलिसांची ड्युटीही लावण्यात येते; मात्र बर्‍याचवेळा येथील पोलिस कर्मचारी दांडी मारत असल्यामुळे पोलिस चौकी बेवारसच राहत असल्याचे दिसून येते.

*लाखाळ्यावरील चौकीचे भिजत घोंगडे

गत दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना लाखाळा परिसरातील पोलिस चौकी जमिनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळी हीच चौकी नगर परिषदेच्या खाली जागेवर बांधण्यात येणार असल्याचे बोलल्या जात होते; मात्र दोन वर्ष उलटून गेले असले तरी, अद्याप ही चौकी उभी राहिलेली नाही. या परिसरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहे. त्यामुळे विद्यालयात ज्ञानार्जन करणारे बहुतांश विद्यार्थी याच परिसरात राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच वादावादी सुरू असते. सन २00८ मध्ये अश्याच एका वादावादीच्या घटनेत संतोष वानखेडे या तरूणाची हत्या झाली होती. त्यानंतरही लाखाळा चौकात बर्‍याच घटना घडल्याचे सर्वश्रृत आहे. परिणामी, येथे पोलिस चौकीची नितांत गरज आहे. सदर चौकी सुरू करण्यात यावी, यासाठी या परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे; मात्र अद्याप याची दखल घेतल्या गेली नाही.