शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

रिसोड शहर हगणदरीमुक्त

By admin | Updated: March 18, 2017 03:12 IST

राज्यस्तरीय समितीची घोषणा; विभागातील दुसरे हगणदरीमुक्त शहर.

रिसोड , दि. १७- स्वच्छ भारत अभियानांतर्गत रिसोड शहर हगणदरीमुक्त झाल्याची अधिकृत माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी शुक्रवार, १७ मार्च रोजी दिली. त्यामुळे रिसोड हे अमरावती विभागातील हगणदरीमुक्त होणारे दुसरे शहर ठरले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत रिसोड नगपरिषदेने रिसोड शहर ओडीएफ हगणदरीमुक्त घोषित केल्यामुळे व जिल्हास्तरीय समितीने पाहणी करुन हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार १६ मार्चला राज्यस्तरीय तपासणी समितीने शहरात फिरुन तपासणी केली व १७ मार्चला कार्यालयीन कागदपत्राची पाहणी करुन रिसोड शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केल्याची माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. या राज्यस्तरीय तपासणी समितीमध्ये सोमनाथ शेटे अतिरिक्त आयुक्त अमरावती महानगरपालिका अमरावती, चंद्रकांत सोनावणे जिल्हा प्रशासन अधिकारी न.प. हिंगोली, दीपक बाचुळकर सर्मथ असोसिएशटस कोथरुड पुणे व कार्तिक लोखंडे यांचा समावेश होता. त्यांचे सोबत समन्वयक म्हणून दीपक मोरे जिल्हा प्रशासन अधिकारी वाशिम हे उपस्थित होते त्यांचे न.प. आगमनानंतर त्यांनी नगर परिषदेची अंतर्गत पाहणी केली. त्यानंतर शहरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी, तसेच नगर परिषद शाळांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. लाभार्थींनी बांधलेल्या शौचालयांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून माहिती प्राप्त केली. तसेच रात्री ७ ते ९ पर्यंत व सकाळी ५ वाजता शहरातील प्रत्येक भागात फिरून हगणदरीमुक्त स्थळाची पाहणी करुन उघड्यावर कोणी शौचास बसला आहे का, याची पाहणी केली. १७ मार्च २0१७ ला सकाळी ६ ते ८ ओडीएफची पाहणी केली व नंतर न.प.मध्ये प्रशासकीय कागदपत्राची पाहणी करुन हगणदरीमुक्तीसाठी केलेल्या कार्याचा अहवाल याबाबत सर्व माहिती घेतली व त्यानुसार रिसोड न.प. हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले, अशी माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. विशेष म्हणजे अमरावती विभागात रिसोड हे हगणदरीमुक्त होणारे हे दुसरेच शहर ठरले आहे. शहर हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शन व सर्व नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकारी पानझाडे यांनी सांगितले.