शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:05 IST

Water Scarcity : महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

- यशवंत हिवराळेराजुरा- मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात सध्या स्थितीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पूरवुन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.

खैरखेडा गावात पाणी टंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टॅंकर हे जणू गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून समीकरण बनले आहे. आदिवासी व बंजारा समाज बहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावाचा संपूर्ण भुभाग खडकाळ डोंगरदऱ्या व कडा कपारींनी वेढलेला आहे. गावात पाचशे फुटावर कूपनलिका घेऊनही त्याला पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नसल्याने या गावात सार्वजनिक तथा खाजगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पानवठा नाही. गावात एकही हातपंप वा पानवठा नसलेलं बहुदा हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील जनतेची तहान दुषीत पाण्यावर भागवली जाते. बरेचदा नदीपात्रातील ज्या डोहावर कुत्रे,गुरे पाणी पितात, त्याच डोहानजीक झीरि खोदून त्यातील दुषीत पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे वास्तव आहे. महिलांनाही धुणे धुण्यासाठी गाव परिसरातील दोन कि.मी.अंतरावरील नदी पात्रातील डोहावर पायपीट करून भर उन्हात जाव लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. उपाययोजना शून्य असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई