शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

नागरिकांनो, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात कोणतीही माहिती लपवू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:09 IST

कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी कधी तर जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोनाबाधित व्यक्तींना दूर लोटतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाने कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.कोरोना विषाणू संसर्गापासून होणारा कोविड-१९ हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यूच होणार, हा गैरसमज आहे. लवकर निदान व उपचाराने कोरोना संसर्गावर मात करता येते. ज्या प्रमाणे इतर संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती बरी झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होत नाही, त्याचप्रमाणे कोविड-१९ या आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा इतरांना कोणताही संसर्ग होत नाही. त्यामुळे अशा ‘कोविड’मुक्त व्यक्तींपासून दुरावा न ठेवता, त्यांना मानसिक आधार देण्याचे आवाहनही मोडक यांनी केले. कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, या संसगार्चे निदान होण्यास विलंब होतो, डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कुणीही माहिती लपवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरजकोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकरत लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारासोबतच मानसिक आधाराची सुद्धा गरज असते. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यू होतो, असे नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. या संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार घेतल्यानंतर अनेकजण या आजारावर मात करून परतले आहेत. ते सर्वजण कोरोनामुक्त जीवन जगत आहेत, समाजात वावरत आहेत. तरीही लोकांच्या मनामध्ये कोरोना संसर्गाविषयीचा गैरसमज कायम आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीकडून इतरांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे कोरोनावर मात करून परतल्यानंतर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मोडक यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या