शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बालदिनापासून बाल स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा

By admin | Updated: November 14, 2014 01:31 IST

वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविली जाणार स्वच्छता मोहीम, यशस्वीतेची जबाबदारी सोपविली शिक्षकांवर.

वाशिम : शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यभरात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान बालस्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्‍विनी भिडे यांनी या मोहिमेंतर्गतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांना या मोहिमेच्या अंमलबजावणीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपवावा लागणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत, हे ध्येय २0१९ पयर्ंत साध्य करण्यात बालकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मोहिमेद्वारे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता आणि त्याद्वारे शाळेत आरोग्यदायी व प्रफुल्लित वातावरण निर्माण होईल, असे सरकारला अभिप्रेत आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. वातावरणनिर्मितीसाठी स्वच्छता व आरोग्यविषयक संदेश देणारे बॅनर, होडिर्ंग्ज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स फलक कल्पकरीत्या तयार करून विविध कार्यालयांच्या मुख्यालयी आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात लावायचे आहेत. मोहिमेच्या प्रारंभी अथवा मोहिमेत स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणारे संदेश देणार्‍या विविध स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. त्यात चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी आदींचा समावेश असेल. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक संदर्भ याद्वारे मुलांशी संवाद साधायचा आहे. बालके जेवणापूर्वी व नंतर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धूत असल्याची खात्री करावयाची आहे. हात धुण्याच्या जागी साबण, पाणी, हातरुमाल उपलब्ध असल्याची खात्री करावयाची आहे.