शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

चिखली प्रकल्प ठरत आहे शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

शेती सिंचित होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी धरणाची निर्मिती केली. राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीला ...

शेती सिंचित होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी धरणाची निर्मिती केली. राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीला सुरुंग लावण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचे चिखली प्रकल्पावरून दिसून येते. शेतकरीबांधवांचे शिवार या धरणांनी हिरवेगार होईल आणि कुटुंबीयांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल या भाबड्या आशेने लाखमोलाच्या जमिनी शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्यात या धरणाच्या बांधकामाला दिलेल्या आहेत हे विशेष.

पाटबंधारे विभाग वाशिमच्या दुर्लक्षित धोरणाचा परिपाक म्हणजे मानोरा तालुक्यातील बहुतांश धरणांच्या भिंतीवरती झाडांची जंगले तयार झालेली आहेत. त्यानंतर कॅनॉलच्या दोन्ही बाजूलासुद्धा प्रचंड प्रमाणात झाडेझुडपे, काटेकुटे तयार होऊन धरणाच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणे अशक्य झालेले आहे.

केवळ कालव्यांची नासधूस व नादुरुस्ती हेच विषय नसून प्रचंड किमतीचे असलेली सांडवे नादुरुस्त असल्याने आणि धरणांच्या भिंतीही नादुरुस्त झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे. ओपन कालव्याऐवजी बंद नलिका वितरणप्रणालीद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल आणि गळती कमी होईल. तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम -सुफलाम होण्याकडे वाटचाल करेल, अशा चर्चा आता या धरणांच्या निमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. मानोरा तालुका आणि जिल्ह्यामध्ये धरणे असून धरणावरील अनागोंदीमुळे ७० टक्क्यांपर्यंत ही शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचित होत नसल्यामुळे या धरणांचे ऑडिट होणे आता अतिआवश्यक झाल्याचे सूरही शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे आणि उपविभागीय अभियंता सचिन शिंदे यांनी चिखली येथील धरण क्षेत्राला नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली आहे. त्यामुळे धरणाची काय व्यथा, स्थिती आहे हे संबंधितांच्या लक्षात आली. चिखली येथील धरणाप्रमाणेच फूलउमरी, पंचाळा, वाईगौळ, रतनवाडी, रुई गोस्ता, खापरदरी, आसोला, आमदरी या मानोरा तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील धरणांची अवस्था कमी-जास्त प्रमाणात सारखीच आहे.