शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

चिखली प्रकल्प ठरत आहे शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

शेती सिंचित होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी धरणाची निर्मिती केली. राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीला ...

शेती सिंचित होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी धरणाची निर्मिती केली. राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीला सुरुंग लावण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचे चिखली प्रकल्पावरून दिसून येते. शेतकरीबांधवांचे शिवार या धरणांनी हिरवेगार होईल आणि कुटुंबीयांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल या भाबड्या आशेने लाखमोलाच्या जमिनी शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्यात या धरणाच्या बांधकामाला दिलेल्या आहेत हे विशेष.

पाटबंधारे विभाग वाशिमच्या दुर्लक्षित धोरणाचा परिपाक म्हणजे मानोरा तालुक्यातील बहुतांश धरणांच्या भिंतीवरती झाडांची जंगले तयार झालेली आहेत. त्यानंतर कॅनॉलच्या दोन्ही बाजूलासुद्धा प्रचंड प्रमाणात झाडेझुडपे, काटेकुटे तयार होऊन धरणाच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणे अशक्य झालेले आहे.

केवळ कालव्यांची नासधूस व नादुरुस्ती हेच विषय नसून प्रचंड किमतीचे असलेली सांडवे नादुरुस्त असल्याने आणि धरणांच्या भिंतीही नादुरुस्त झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे. ओपन कालव्याऐवजी बंद नलिका वितरणप्रणालीद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल आणि गळती कमी होईल. तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम -सुफलाम होण्याकडे वाटचाल करेल, अशा चर्चा आता या धरणांच्या निमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. मानोरा तालुका आणि जिल्ह्यामध्ये धरणे असून धरणावरील अनागोंदीमुळे ७० टक्क्यांपर्यंत ही शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचित होत नसल्यामुळे या धरणांचे ऑडिट होणे आता अतिआवश्यक झाल्याचे सूरही शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे आणि उपविभागीय अभियंता सचिन शिंदे यांनी चिखली येथील धरण क्षेत्राला नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली आहे. त्यामुळे धरणाची काय व्यथा, स्थिती आहे हे संबंधितांच्या लक्षात आली. चिखली येथील धरणाप्रमाणेच फूलउमरी, पंचाळा, वाईगौळ, रतनवाडी, रुई गोस्ता, खापरदरी, आसोला, आमदरी या मानोरा तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील धरणांची अवस्था कमी-जास्त प्रमाणात सारखीच आहे.