शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला स्वच्छतेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:50 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विभाग प्रमुखांची समन्वय सभा घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विभाग प्रमुखांची समन्वय सभा घेतली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना मीणा यांनी दिल्या.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ आॅगस्ट ते  ३१ आॅक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वात जास्त गूण मिळविणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावर २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या दृष्टिने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तयारी करण्यात यावी, प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय साधून यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना मीणा यांनी विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाºयांना दिल्या. ग्रामपंचायत स्तरावरील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रा स्थळे तसेच सार्वजनिक ठिकाणे आदींची स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली जाणार आहे. यामध्ये शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याचे पाण्याचे नियोजन आदींना प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान उपरोक्त बाबींची प्राधान्यक्रमाने तपासणी होणार असून, स्वच्छतेबाबत व स्वच्छ भारत मिशनसंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या जाणार आहेत. हगणदरीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी, नादुरूस्त शौचालय प्रगती, छायाचित्र अपलोड आदी बाबींचा समावेशही सर्वेक्षणाच्या गुणांकनात करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना मीणा यांनी दिल्या. विभाग प्रमुखांनी समन्वय साधून स्वच्छ सर्वेक्षणसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करून देशपातळीवर वाशिम जिल्ह्याचे नाव उंचाविण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने, सुदाम इस्कापे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद