शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

रासायनिक पध्दतीने पिकविलेले आंबे आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:25 IST

बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो. परंतु बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. ग्रामीण भागातील आंबा उत्पादक वगळता नैसर्गिंक पध्दतीने पिकविलेला आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे. विशेष हा आंबा नागरिक ओळखत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. नैसर्गिकरीत्या फळे पिकताना त्यामध्ये इथिलिन वायू तयार होतो व फळे पिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक फळानुसार ही नैसर्गिक प्रक्रिया फळे काढल्यानंतर २ ते ५ दिवसांनी सुरू होते. हा अवधी जास्त असल्याने अनेक फळ उत्पादक फळे लवकर पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कॅल्शियम कार्बाईडवर बंदी असतांना सुध्दा हा प्रकार सर्रास दिसून येतो. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देवून हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार बंद करणे गरजेचे आहे.गवती पेेंढयाच्या थरावर पिकतात नैसर्गिक फळेसर्वसाधारणपणे आंब्याची फळे ७.३० सें.मी. ते १० सें.मी. जाडीचा भातपेंढा किंवा गवती पेंढ्याच्या थरावर फळांचा एक थर देऊन पिकवतात. अशा पद्धतीने ठेवलेली फळे ८ ते १० दिवसांत उत्तमप्रकारे पिकतात. सर्वसाधारणपणे फळे देठाकडून कोयीकडे, तर कोयीकडून सालीकडे अशा पद्धतीने आंबा पिकतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यामध्ये काही ठिकाणी देठाच्या विरुद्ध भागास (चोचीकडे) आंबा थोडासा आंबट असतो. आंब्याच्या न पिकलेल्या फळांच्या अढीत काही पक्व फळे ठेवल्यास पिकण्याची क्रिया लवकर सुरू होते.

ओळखा कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळेकॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ही घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळामध्ये योग्य ती पिकवण प्रक्रिया न झाल्यामुळे फळे चवीस आंबट किंवा चवहीन असतात. तसेच आतून काळसर रंग आणि विचित्र स्वाद असलेली असतात. याउलट इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.

रसायनाने पिकविलेले आंबे खाल्ल्याने पोटाच्या विकारांसह कर्करोगासारखे गंभीर आजारही बळावण्याची शक्यता आहे. रसायनात पिकविलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांच्या पोटात दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी होणे आदी आजारांचे लक्षण निदर्शनास येतात. तसेच याचे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवतात. - डॉ. अनिल कावरखेवैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

टॅग्स :washimवाशिमMangoआंबा