शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रासायनिक पध्दतीने पिकविलेले आंबे आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:25 IST

बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो. परंतु बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. ग्रामीण भागातील आंबा उत्पादक वगळता नैसर्गिंक पध्दतीने पिकविलेला आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे. विशेष हा आंबा नागरिक ओळखत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. नैसर्गिकरीत्या फळे पिकताना त्यामध्ये इथिलिन वायू तयार होतो व फळे पिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक फळानुसार ही नैसर्गिक प्रक्रिया फळे काढल्यानंतर २ ते ५ दिवसांनी सुरू होते. हा अवधी जास्त असल्याने अनेक फळ उत्पादक फळे लवकर पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कॅल्शियम कार्बाईडवर बंदी असतांना सुध्दा हा प्रकार सर्रास दिसून येतो. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देवून हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार बंद करणे गरजेचे आहे.गवती पेेंढयाच्या थरावर पिकतात नैसर्गिक फळेसर्वसाधारणपणे आंब्याची फळे ७.३० सें.मी. ते १० सें.मी. जाडीचा भातपेंढा किंवा गवती पेंढ्याच्या थरावर फळांचा एक थर देऊन पिकवतात. अशा पद्धतीने ठेवलेली फळे ८ ते १० दिवसांत उत्तमप्रकारे पिकतात. सर्वसाधारणपणे फळे देठाकडून कोयीकडे, तर कोयीकडून सालीकडे अशा पद्धतीने आंबा पिकतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यामध्ये काही ठिकाणी देठाच्या विरुद्ध भागास (चोचीकडे) आंबा थोडासा आंबट असतो. आंब्याच्या न पिकलेल्या फळांच्या अढीत काही पक्व फळे ठेवल्यास पिकण्याची क्रिया लवकर सुरू होते.

ओळखा कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळेकॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ही घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळामध्ये योग्य ती पिकवण प्रक्रिया न झाल्यामुळे फळे चवीस आंबट किंवा चवहीन असतात. तसेच आतून काळसर रंग आणि विचित्र स्वाद असलेली असतात. याउलट इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.

रसायनाने पिकविलेले आंबे खाल्ल्याने पोटाच्या विकारांसह कर्करोगासारखे गंभीर आजारही बळावण्याची शक्यता आहे. रसायनात पिकविलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांच्या पोटात दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी होणे आदी आजारांचे लक्षण निदर्शनास येतात. तसेच याचे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवतात. - डॉ. अनिल कावरखेवैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

टॅग्स :washimवाशिमMangoआंबा