शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:19 IST

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत.या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दिशाभूल होत असल्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकेत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील बहुप्रतिक्षीत नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे. तथापि, या भूसंपादन प्रक्रि येत ठरलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे; परंतु प्रशासकीय अधिकारी या उद्देशाला तडा देत आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती बागायती अर्थात सिंचन क्षेत्राखालील असतानाही ती कोरडवाहू दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या शेतकºयांना गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली. त्याच शेतकऱ्यांची नोंद कोरडवाहू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अनेक शेतकºयांकडे पक्क्या पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची पूर्ण सुविधा आहे. त्यांनाही कोरडवाहू दाखविले आहे. त्याशिवाय फळबागधारक शेतकऱ्यांचीही कोरडवाहू म्हणून अधिकाºयांकडून नोंद केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकतेत राहिले नसून, त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केले आहे. तथापि, अधिकारी वर्ग मात्र शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करीत असल्याचा आरोपही शेतकºयांनी निवेदनातून केला आहे. सुभाष गणेशलाल मानधने, शोभा डिगांबर दहात्रे, विजय दहात्रे, मनोज दहात्रे, कृष्णा दहात्रे, गजानन श्रीकिसन दहात्रे, कैलाश दहात्रे, दलाल धन दहात्रे, राजू दहात्रे, सुर्यप्रकाश दहात्रे, रमेश दहात्रे, स्वाती दहात्रे, ज्योती दहात्रे आदि शेतकºयांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले असून, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणीसमृद्धी मार्गासाठी शेतकºयांकडून जमिनी घेताना त्याचा योग्य मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, या मार्गासाठी अधिकारी वर्ग दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार, पालकमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMalegaonमालेगांव