शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:19 IST

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत.या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दिशाभूल होत असल्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकेत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील बहुप्रतिक्षीत नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे. तथापि, या भूसंपादन प्रक्रि येत ठरलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे; परंतु प्रशासकीय अधिकारी या उद्देशाला तडा देत आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती बागायती अर्थात सिंचन क्षेत्राखालील असतानाही ती कोरडवाहू दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या शेतकºयांना गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली. त्याच शेतकऱ्यांची नोंद कोरडवाहू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अनेक शेतकºयांकडे पक्क्या पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची पूर्ण सुविधा आहे. त्यांनाही कोरडवाहू दाखविले आहे. त्याशिवाय फळबागधारक शेतकऱ्यांचीही कोरडवाहू म्हणून अधिकाºयांकडून नोंद केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकतेत राहिले नसून, त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केले आहे. तथापि, अधिकारी वर्ग मात्र शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करीत असल्याचा आरोपही शेतकºयांनी निवेदनातून केला आहे. सुभाष गणेशलाल मानधने, शोभा डिगांबर दहात्रे, विजय दहात्रे, मनोज दहात्रे, कृष्णा दहात्रे, गजानन श्रीकिसन दहात्रे, कैलाश दहात्रे, दलाल धन दहात्रे, राजू दहात्रे, सुर्यप्रकाश दहात्रे, रमेश दहात्रे, स्वाती दहात्रे, ज्योती दहात्रे आदि शेतकºयांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले असून, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणीसमृद्धी मार्गासाठी शेतकºयांकडून जमिनी घेताना त्याचा योग्य मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, या मार्गासाठी अधिकारी वर्ग दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार, पालकमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMalegaonमालेगांव