शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बदलत्या शैक्षणिक धोरणाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील संघटना एकवटल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:45 IST

वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळ व शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देसंस्थाचालकही आक्रमक जिल्हास्तरीय सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळ व शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. या सभेच्या अध्यस्थानी शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक होते. संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विनोद नरवाडे, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश नंदकुले, विदर्भ संघटनेचे सचिव प्रा. टी.बी. राठोड, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, विमाशिचे विनायक उज्जैनकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव विजयराव शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रात होत असलेले किचकट बदल, लादल्या जाणाºया जाचक अटी, शासनाचे नवनविन धोरण, वारंवार येणारे शासन निर्णय, शिक्षणाबद्दलची उदासीनता व शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण, ग्रामीण क्षेत्रातील तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला गोंधळ, आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.१३ जानेवारी २०१८ रोजी ‘बदलते शैक्षणीक धोरण’, या विषयावर वाशिम येथे होणाºया अधिवेशनासंदर्भात सभेत नियोजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. किरणराव सरनाईक म्हणाले, की शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रीत येवून गोरगरीबाचे शिक्षण वाचविण्यासाठी शासनाच्या जाचक व अन्यायकारक धोरणांविरूद्ध आवाज उठवायला हवा. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाविरूद्ध सर्व शिक्षण संस्था, संघटना, समाज घटकांनी १३ जानेवारीच्या अधिवेशनासाठी  एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले़  या बैठकीस अशोक कांबळे, नारायणराव काळबांडे, गोविंद चतरकर, श्रीकृष्ण सोलव, मिलींद कव्हर, पी.डी. देशमुख, क. बा. जोशी, सुनील ढेकळे, सुनील कोंघे, केशव म्हातारमारे, विठ्ठलराव सरनाईक, बी.टी. बिल्लारी, भगवानराव गायकवाड, राजेश खाडे, पी.व्ही. कापुरे, राजेश संगवई, परमेश्वर व्यवहारे, रंजना देशमुख, विजया सरनाईक, आसाराम गिते, सुरेशचंद्र करनावट आदींसह विविध शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते़  सभेचे संचालन विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष अनिल काळे यांनी केले; तर आभार काळबांडे यांनी मानले़.

टॅग्स :washimवाशिम