शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या ११४ ...

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या ११४ टक्के क्षेत्रांवर गहू व हरभरा पिकाची लागवड झाली. यामध्ये गहू पेरणी क्षेत्र ३३ हजार ४८२ हेक्टर व हरभरा पेरणी क्षेत्र ५९ हजार ५३२ हेक्टर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाचा परिपक्व होण्याचा कालावधी पूर्ण झाला असून, पीक काढणीस आलेले आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा पिकाची काढणी चालू आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून शेतामध्ये सुकवणीकरिता ढीग लावलेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दि. १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच त्याचे ढीग लावून झाकून ठेवावे किंवा शक्य असल्यास मळणी करून संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.