शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

जातीपातीचे राजकारण आले रंगात

By admin | Updated: October 10, 2014 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोटजातही झाली प्रतिष्ठेची.

वाशिम - आघाडी आणि युतीमध्ये झालेल्या फाटाफुटीने, तीनही विधानसभा मतदारसंघात विजयाचे समीकरण बिघडविले आहे. परिणामी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीपातीचे भावनिक आवाहन करून पोटजातीच्या मुद्यालाही हात घातला जात असल्याने निवडणुकीचे चित्र अधिकच अस्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णचा नारा दिल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीन म तदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी २९ अपक्ष तर २८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर नशिब आजमावत आहेत. राज्यात सर्वत्र निवडणुकीचा माहौल रंगात आलेला असताना, वाशिम जिल्ह्यात कारंजाचा अपवाद वगळता उर्वरि त दोनही विधानसभा मतदारसंघातील गारवा अजूनही कायमच असल्याचे दिसून येते. कारंजात निवडणुकीच्या व्यासपीठावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. युती, आघाडी तुटल्यामुळे सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याचे दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर कोणत्याही एकाच जातीच्या उमेदवाराला मतदारांनी वारंवार कौल दिला नसल्याचे दिसून येते. २0१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला आहे; परंतु मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुणाकडेही ठोस मुद्दे नसल्याने शेवटी जाती-पातीच्या मुद्याभोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या होणार्‍या गुप्त बैठकांवरूनही तेच स्पष्ट होत आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत जाती-पोटजातीचा मुद्दा फारसा प्रतिष्ठेचा नव्हता; मात्र मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याचे राजकीय वतरुळातील चर्चेवरून दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघात मराठा समाजा तील सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, डॉ. सुधीर कव्हर, ज्योती गणेशपुरे , जैन समाजातील राजेंद्र पाटणी तर मुस्लिम समाजातील युसूफ पुंजानी हे प्रबळ उमेदवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पक्षाच्या एकगठ्ठा मतदानाबरोबरच जात आणि पोटजातीचे मतदानही पदरात पाडून घेण्यासाठी आता समाजाच्या गुप्त बैठकांचे सत्रही सुरू झाल्याचे राजकीय चर्चेतून समोर येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कमकुवत आणि प्रबळ उमेदवाराचा अंदाज आल्यानंतर नातेसंबंध, पोटजात व पक्ष बाजूला सारून जातीच्या प्रबळ उमेदवारालाच पसंती देण्यापर्यंतची फिल्डिंगही समाजाच्या या गुप्त बैठकांमधूनच लावली जात असल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे.प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याने पक्षाबरोबरच जात-पोटजात हा फॅक्टरही प्रतिष्ठेचा बनला असल्याचे दिसून येते. मराठा समाजाचे मतदान चार उमेदवारात विभागले जाण्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. नेमकी हीच बाब हेरून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याने निवडणुकीला जातीपातीचा रंग चढत असल्याने निकाल कसे लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.