शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जातीपातीचे राजकारण आले रंगात

By admin | Updated: October 10, 2014 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोटजातही झाली प्रतिष्ठेची.

वाशिम - आघाडी आणि युतीमध्ये झालेल्या फाटाफुटीने, तीनही विधानसभा मतदारसंघात विजयाचे समीकरण बिघडविले आहे. परिणामी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीपातीचे भावनिक आवाहन करून पोटजातीच्या मुद्यालाही हात घातला जात असल्याने निवडणुकीचे चित्र अधिकच अस्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णचा नारा दिल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीन म तदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी २९ अपक्ष तर २८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर नशिब आजमावत आहेत. राज्यात सर्वत्र निवडणुकीचा माहौल रंगात आलेला असताना, वाशिम जिल्ह्यात कारंजाचा अपवाद वगळता उर्वरि त दोनही विधानसभा मतदारसंघातील गारवा अजूनही कायमच असल्याचे दिसून येते. कारंजात निवडणुकीच्या व्यासपीठावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. युती, आघाडी तुटल्यामुळे सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याचे दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर कोणत्याही एकाच जातीच्या उमेदवाराला मतदारांनी वारंवार कौल दिला नसल्याचे दिसून येते. २0१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला आहे; परंतु मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुणाकडेही ठोस मुद्दे नसल्याने शेवटी जाती-पातीच्या मुद्याभोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या होणार्‍या गुप्त बैठकांवरूनही तेच स्पष्ट होत आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत जाती-पोटजातीचा मुद्दा फारसा प्रतिष्ठेचा नव्हता; मात्र मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याचे राजकीय वतरुळातील चर्चेवरून दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघात मराठा समाजा तील सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, डॉ. सुधीर कव्हर, ज्योती गणेशपुरे , जैन समाजातील राजेंद्र पाटणी तर मुस्लिम समाजातील युसूफ पुंजानी हे प्रबळ उमेदवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पक्षाच्या एकगठ्ठा मतदानाबरोबरच जात आणि पोटजातीचे मतदानही पदरात पाडून घेण्यासाठी आता समाजाच्या गुप्त बैठकांचे सत्रही सुरू झाल्याचे राजकीय चर्चेतून समोर येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कमकुवत आणि प्रबळ उमेदवाराचा अंदाज आल्यानंतर नातेसंबंध, पोटजात व पक्ष बाजूला सारून जातीच्या प्रबळ उमेदवारालाच पसंती देण्यापर्यंतची फिल्डिंगही समाजाच्या या गुप्त बैठकांमधूनच लावली जात असल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे.प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याने पक्षाबरोबरच जात-पोटजात हा फॅक्टरही प्रतिष्ठेचा बनला असल्याचे दिसून येते. मराठा समाजाचे मतदान चार उमेदवारात विभागले जाण्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. नेमकी हीच बाब हेरून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याने निवडणुकीला जातीपातीचा रंग चढत असल्याने निकाल कसे लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.