शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कॅशलेस व्यवहाराचा मालेगावात शेतक-यांना बसतोय फटका

By admin | Updated: December 29, 2016 15:40 IST

सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत

 ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि.29 -  केंद्र सरकारने नोटांबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला, याचा फटका तालुक्यातील शेतक-यांना शेतमाल विकताना बसत आहे. सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप पिकासाठी योग्य पाऊस झाला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे चांगले उत्पन्न झाले. 
 
नोटाबंदीनंतर शेतकरी जर माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा व्यापारी यांच्याकडे गेले असता,  त्यांना व्यापारी म्हणतायेत, चेकने पैसे घेतले तर पूर्ण भावाने देऊ आणि जर नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने मिळतील. काही शेतक-यांचे खाते बँकामध्ये नसल्याने ते चेकने, धनादेशाने पैसे घेऊ शकत नाहीत, अशावेळी ते नगदी पैशाची मागणी करतात. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे.
 
शेतक-यांना लिलावामधील दराने पैसे देण्यात यावे, ज्या शेतक-यांकडे बँकेचे खाते नाही त्यांना खाते काढेपर्यंत तरी नगदीत पण पूर्ण रक्कम देण्यात यावी - तुकाराम गावंडे, शेतकरी  
 
व्यापा-यांनी योग्य दराने खरेदी करुन नियमानुसार पैसे दयावयास पाहिजे. कधी कधी व्यापारी यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे शेतकºयांनी बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. -बबनराव चोपडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती