शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहाराचा मालेगावात शेतक-यांना बसतोय फटका

By admin | Updated: December 29, 2016 15:40 IST

सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत

 ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि.29 -  केंद्र सरकारने नोटांबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला, याचा फटका तालुक्यातील शेतक-यांना शेतमाल विकताना बसत आहे. सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप पिकासाठी योग्य पाऊस झाला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे चांगले उत्पन्न झाले. 
 
नोटाबंदीनंतर शेतकरी जर माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा व्यापारी यांच्याकडे गेले असता,  त्यांना व्यापारी म्हणतायेत, चेकने पैसे घेतले तर पूर्ण भावाने देऊ आणि जर नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने मिळतील. काही शेतक-यांचे खाते बँकामध्ये नसल्याने ते चेकने, धनादेशाने पैसे घेऊ शकत नाहीत, अशावेळी ते नगदी पैशाची मागणी करतात. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे.
 
शेतक-यांना लिलावामधील दराने पैसे देण्यात यावे, ज्या शेतक-यांकडे बँकेचे खाते नाही त्यांना खाते काढेपर्यंत तरी नगदीत पण पूर्ण रक्कम देण्यात यावी - तुकाराम गावंडे, शेतकरी  
 
व्यापा-यांनी योग्य दराने खरेदी करुन नियमानुसार पैसे दयावयास पाहिजे. कधी कधी व्यापारी यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे शेतकºयांनी बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. -बबनराव चोपडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती