-----------
पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी
वाशिम: निम्मा पावसाळा उलटला तरी ग्रामीण भागांतील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असून, पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल ग्रामपंचायतींंनी दखल घेण्याची मागणी होत आहे.
------------------
रोही करताहेत पिके फस्त
वाशिम : खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. त्यात रोहिंचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, तूर, कपाशीची पिके फस्त करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
------------------
‘रोहयो’च्या कामांची तयारी
वाशिम: जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉबकार्डधारक मजूर आहेत. या कामगारांसाठी रोहयोची कामे सुरू करण्याची तयारी रोहयो विभागाने केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
---------
शेतकऱ्यांची वहिवाट बंद
वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली; परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली आहे.
--------------