शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कारंजा तालुक्यात झपाट्याने वाढताहेत काेराेना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. त्यात कारंजा तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून, ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. त्यात कारंजा तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून, २३ व २४ या दाेन दिवसात कारंजा तालुक्यात १४० जण काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापाठाेपाठ वाशिम तालुक्यात संख्या वाढत आहे.

जिल्ह्यात १४ फेब्रुवारीपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. वाशिम जिल्ह्यात २३ व २४ फेब्रुवारी राेजी आढळून आलेल्या काेराेना बाधितांच्या संख्येमध्ये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आराेग्य विभागाच्या नाेंदीवरून दिसून येत आहे. यामध्ये २३ फेब्रुवारी राेजी जिल्ह्यात आढळून आलेल्या काेराेना पाॅझिटिव्हमध्ये कारंजा ८७, वाशिम १३, रिसाेड ३६, मालेगाव २, मंगरूळ १२, मानाराे ०, तर २४ फेब्रुवारी राेजी कारंजा ५३, वाशिम ३४, रिसाेड ४, मालेगाव ६, मंगरूळ ०, मानाराे ५ बाधितांचा समाेवश आहे. यामध्ये या दाेन दिवसात कारंजा तालुक्यात १४०, वाशिम तालुक्यात ७४, रिसाेड तालुक्यात ४०, मालेगाव तालुक्यात ८, मंगरूळपीर तालुक्यात १२, तर मानाेरा तालुक्यात ५ जणांचा समावेश आहे.

...............

देगावच्या शाळेने वाढविला रिसाेड तालुक्यातील काेराेना बाधितांचा आकडा

२२ व २३ फेब्रुवारी राेजी रिसाेड तालुक्यात आढळून आलेल्या ४० काेराेना बाधितांची संख्या २४ फेब्रुवारी राेजी देगाव येथील तब्बल १९० विद्यार्थी पाॅझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा माेठ्या प्रमाणात वाढला आहे. २४ फेब्रुवारी राेजी आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गत दाेन दिवसात या शाळेतील तब्बल २२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रिसाेड तालुक्यातील काेराेना बाधितांची संख्या पाहता तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. परंतु २४ फेब्रुवारीच्या अहवालावरून रिसाेड तालुका बाधितांमध्ये सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे.

..........

विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्ह्यात सर्वत्र कारवाई

जिल्ह्यात काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. वाशिम नगर परिषदेच्यावतीने आजपर्यंत शेकडाे दुकानदारांसह नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या पथकातील कनाेजे यांनी दिली. दरराेज शहरात फिरून दुकानदार, रस्त्यावरील मास्क नसलेल्या नागरिकांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे.