शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

उंटअळीसोबतच सोयाबीनवर खोडमाशीचेही आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:21 IST

सोयाबीन पिकावर सुरूवातीला हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख तथा सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर सुरूवातीला हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यावर किटकनाशक फवारणीच्या माध्यमातून नियंत्रण मिळविणे सुरू असतानाच फुलधारणेच्या अवस्थेत खोडमाशीनेही हल्लाबोल केला आहे. त्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनीही दुजोरा दिला. दरम्यान, ओढवलेल्या रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.वाशिम जिल्ह्यात सरासरी ४ लाख ७०९ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबिनचा राहतो. त्यानुसार, यावर्षीही तब्बल २ लाख ८८ हजार २४८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. दरम्यान, विलंबाने सुरू झाला असला तरी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सोयाबिनचे पिक चांगलेच बहरले आहे; मात्र सुरूवातीच्या टप्प्यात या पिकावर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील राजगाव, अटकळी, अडोळी, टो, जुमडा आदी गावांमधील पिकांवर या अळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्कासह किटकनाशकांची फवारणी करणे सुरू केले. ही अळी नियंत्रणात येते न येते तोच गत काही दिवसांपासून पाने, फांदी, खोड पोखरणाºया खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. खोडमाशीमुळे सोयाबिनच्या वाढीवर परिणाम होवून फुले आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात. शेंगांमध्ये तुलनेने लहान व सुरकुतलेले दाणे भरले जातात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास सोयाबिनचे झाड पूर्णत: सुकून मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशी माहिती डॉ. विकास गौड यांनी दिली.दरम्यान, या अळीपासून पिकाला वाचविण्याकरिता शेतकºयांनी वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या सुकतात. त्यामुळे किडग्रस्त झाडे, पाने आणि फांद्यांचा किडींसह नायनाट करावा. खोडमाशीने अंडी घालू नये, यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानंतरच किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहनही शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनी केले आहे.

शेतांमध्ये किटकनाशक फवारणीच्या कामास वेगयंदा पावसाला विलंब झाल्याने पेरणीची कामे उशीराने झाली. त्यातच आधी हिरवी उंटअळी आणि आता खोडमाशीने सोयाबिनवर हल्ला चढविल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या किडींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी पिकावर किटकनाशक फवारणीच्या कामास चांगलाच वेग आल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी