शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पुलाच्या कडा खचल्या!

By admin | Updated: November 21, 2014 01:25 IST

रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष

मंगरुळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील तर्‍हाळा गावानजीक पुलाच्या कडा खचल्या असून, या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र याकडे रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या शेलूबाजार, तर्‍हाळा, लाठी वळण रस्त्याचे बांधकाम लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अर्धवट अवस्थेत पडले आहे. वळण रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून होत असताना लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत नाही. तसेच प्रशासन सुस्त असल्याने या तीनही गावातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, तर्‍हाळानजीकच्या अरुंद पुलाजवळ आजपर्यंत तीन वाहनचालकांचा अपघातामुळे बळी गेला.सदर घटना संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे घडल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता त्याच ठिकाणच्या पुलाच्या कडा तुटून पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पुलाच्या कडा खचल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाला खरेच नसावी का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी त्याच भागातील रस्त्याची डागडुजी झाली. त्यावेळी अरुंद पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत घेणे आवश्यक होते; मात्र त्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आज द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनधारकांना अरुंद पुलाची कल्पना येत नाही. अचानक त्या ठिकाणी चालकाची धांदल उडाल्याचे प्रकार घडत आहेत. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर रस्ते विकास महामंडळाने या भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वळण रस्त्यासंदर्भात ठोस पाठपुरावा केल्या जात नाही. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधीने वळण रस्त्याबाबत पाठपुरावा केला, तर निश्‍चित यश पदरी पडू शकते; परंतु या गंभीर समस्याकडे सर्व स्तरावरून दुर्लक्ष होत आहे