शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

पुलाच्या कडा खचल्या!

By admin | Updated: November 21, 2014 01:25 IST

रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष

मंगरुळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील तर्‍हाळा गावानजीक पुलाच्या कडा खचल्या असून, या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र याकडे रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या शेलूबाजार, तर्‍हाळा, लाठी वळण रस्त्याचे बांधकाम लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अर्धवट अवस्थेत पडले आहे. वळण रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून होत असताना लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत नाही. तसेच प्रशासन सुस्त असल्याने या तीनही गावातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, तर्‍हाळानजीकच्या अरुंद पुलाजवळ आजपर्यंत तीन वाहनचालकांचा अपघातामुळे बळी गेला.सदर घटना संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे घडल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता त्याच ठिकाणच्या पुलाच्या कडा तुटून पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पुलाच्या कडा खचल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाला खरेच नसावी का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी त्याच भागातील रस्त्याची डागडुजी झाली. त्यावेळी अरुंद पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत घेणे आवश्यक होते; मात्र त्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आज द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनधारकांना अरुंद पुलाची कल्पना येत नाही. अचानक त्या ठिकाणी चालकाची धांदल उडाल्याचे प्रकार घडत आहेत. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर रस्ते विकास महामंडळाने या भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वळण रस्त्यासंदर्भात ठोस पाठपुरावा केल्या जात नाही. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधीने वळण रस्त्याबाबत पाठपुरावा केला, तर निश्‍चित यश पदरी पडू शकते; परंतु या गंभीर समस्याकडे सर्व स्तरावरून दुर्लक्ष होत आहे