शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

पुलांचे ‘ऑडिट’!

By admin | Updated: October 28, 2016 03:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील २११ पुलांचे निरीक्षण, ३४ पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. २७- सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील २११ पुलांचे निरीक्षण करण्यात आले असून, यातील ३४ पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन पुलांची उंची वाढविण्यासाठी ते नव्याने बांधण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून घडलेल्या अपघातात एका बसमधील जवळपास ३0 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या अपघाताची गंभीर दखल राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने घेतली आणि राज्यातील दोन हजार २00 पुलांचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे निर्देशही राज्यभरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयांकडे देण्यात आले. शासनाच्या या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील पुलांचे निरीक्षण करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २११ पूल आहेत. यामध्ये राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलांचा समावेश आहे.सदर मार्गावरील सर्व पुलांची तपासणी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व शाखा अभियंता यांनी अथक परिश्रम करून पूर्ण केली आणि शासनाकडे अहवाल सादर केला आहे. बांधकाम विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २११ पुलांपैकी १७५ पूल सुस्थितीत आणि त्यांची कसलीही दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, तर उर्वरित ३४ पुलांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची दुरुस्ती आवश्यक असल्याचेही स्पष्ट होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाजपत्रकही बांधकाम विभागाने वरिष्ठ कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३0 मीटर उंचीचा एकही पूल नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. प्रशासकीय मान्यता आणि शासनाकडून प्राप्त निधीनंतरच या पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले. अंदाजपत्रकातील खर्च वाढणार जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या ३४ पुलांच्या दुरुस्तीसह दोन नव्या पुलांच्या कामासाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार या पुलांच्या कामासाठी जवळपास दोन कोटी ५0 लाख ते तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुचविण्यात आले असले तरी, या खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पुलांची यादी तयार करून राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठविली आहे. आता शासनाने निधीची तरतूद केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दोन मोठय़ा पुलांची पुनर्निमिती आवश्यकजिल्ह्यातील पुलांच्या निरीक्षणादरम्यान बांधकाम विभागाच्या निदर्शनास काही बाबी आढळून आल्या. त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा नदीसह, कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील अडाण नदीवरच्या पुलाची पुननिर्मिती करण्याची गरज असल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आपल्या अहवालात आवश्यक मुद्दे उल्लेखित करून या पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. आता या पुलांची उंची किती वाढवायची, ते अद्याप निश्‍चित झालेले नाही.