शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

पुलांचे ‘ऑडिट’!

By admin | Updated: October 28, 2016 03:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील २११ पुलांचे निरीक्षण, ३४ पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. २७- सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील २११ पुलांचे निरीक्षण करण्यात आले असून, यातील ३४ पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन पुलांची उंची वाढविण्यासाठी ते नव्याने बांधण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून घडलेल्या अपघातात एका बसमधील जवळपास ३0 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या अपघाताची गंभीर दखल राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने घेतली आणि राज्यातील दोन हजार २00 पुलांचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे निर्देशही राज्यभरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयांकडे देण्यात आले. शासनाच्या या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील पुलांचे निरीक्षण करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २११ पूल आहेत. यामध्ये राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलांचा समावेश आहे.सदर मार्गावरील सर्व पुलांची तपासणी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व शाखा अभियंता यांनी अथक परिश्रम करून पूर्ण केली आणि शासनाकडे अहवाल सादर केला आहे. बांधकाम विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २११ पुलांपैकी १७५ पूल सुस्थितीत आणि त्यांची कसलीही दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, तर उर्वरित ३४ पुलांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची दुरुस्ती आवश्यक असल्याचेही स्पष्ट होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाजपत्रकही बांधकाम विभागाने वरिष्ठ कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३0 मीटर उंचीचा एकही पूल नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. प्रशासकीय मान्यता आणि शासनाकडून प्राप्त निधीनंतरच या पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले. अंदाजपत्रकातील खर्च वाढणार जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या ३४ पुलांच्या दुरुस्तीसह दोन नव्या पुलांच्या कामासाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार या पुलांच्या कामासाठी जवळपास दोन कोटी ५0 लाख ते तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुचविण्यात आले असले तरी, या खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पुलांची यादी तयार करून राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठविली आहे. आता शासनाने निधीची तरतूद केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दोन मोठय़ा पुलांची पुनर्निमिती आवश्यकजिल्ह्यातील पुलांच्या निरीक्षणादरम्यान बांधकाम विभागाच्या निदर्शनास काही बाबी आढळून आल्या. त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा नदीसह, कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील अडाण नदीवरच्या पुलाची पुननिर्मिती करण्याची गरज असल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आपल्या अहवालात आवश्यक मुद्दे उल्लेखित करून या पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. आता या पुलांची उंची किती वाढवायची, ते अद्याप निश्‍चित झालेले नाही.