शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुस्तक वाचनाने जीवनात संघर्षाची प्रेरणा मिळते - मोक्षदा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:17 IST

आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे'ग्रंथोत्सव २०१७’ चे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधुनिक युगात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासह तत्सम बाबींचा उद्रेक झाला असला तरी वाचनाला आजही पर्याय नाही. रोजचे वृत्तपत्र वाचले तरी ज्ञानात मोलाची भर पडते. पुस्तक वाचनाने जीवनात संघर्षाची प्रेरणा मिळते. आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.राज्यशासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने तथा वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस.एम.सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायण जोशी सभागृहात आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१७’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.‘महत्त्व गॅझेटियर’चे या विषयवार बोलताना डॉ. दी.प्र. बलसेकर म्हणाले, वाशिम जिल्ह्याच्या गॅझेटियरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने माहिती संकलनाचे काम सुरु असून गॅझेटियरच्या अनुषंगाने वाचकांना जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा ठेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.अमरावती येथील लेखिका रजिया सुलताना यांनी ग्रंथ वाचन व लेखन याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, लेखक हा लेखक असतो. त्याला कोणतीही जात, धर्म नसतो. तसेच त्याचे लेखनही कोणत्या जाती, धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यामुळे वाचकांनी या लिखाणाचा निखळ आस्वाद घेतला पाहिजे. वाचनाने विचार प्रगल्भ बनतात व अनुभव समृद्ध होतात. ग्रंथ  आपल्याला विचार देतात. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांवर प्रेम करायला हवे, असे सुलताना यांनी सांगितले. कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी ग्रंथ लेखनाच्या अनुषंगाने लेखकाची भूमिका मांडली. लेखकाने ग्रंथ लिहिताना त्याचा वाचकांना काय फायदा होईल, याचाही विचार केला पाहिजे. लोकांमध्ये वाचनाची आवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रा. हरिभाऊ क्षीरसागर म्हणाले, वाचन हे आपणास तारते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे. चांगले समाजमन घडविण्यासाठी चांगल्या ग्रंथांचा प्रसार होणे आवश्यक असून त्यासाठी ग्रंथोत्सव उपयुक्त ठरेल, असा आशावाद प्रा. क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.