शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ऑटो जाळल्याच्या वादातून निर्घृण हत्या

By admin | Updated: March 3, 2015 01:37 IST

उकळीपेन येथील घटना.

वाशिम / अनसिंग : येथून जवळच असलेल्या उकळीपेन येथे ऑटो जाळल्याच्या वादावरून एका इसमाची काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. ही घटना रविवार १ मार्च रोजी घडली. अनसिंग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उकळीपेन येथील रहिवासी गजानन आकाश वाघजळे याने किरकोळ वादातून रवी चोखाजी धवसे याचा ऑटो २५ फेब्रुवारी रोजी जाळल्याचा प्रकार घडला होता. रविवारी सायंकाळी गजानन वाघजळे घराजवळून जात असताना झालेल्या नुकसानाचा वचपा काढण्यासाठी रवी चोखाजी धवसे याने गजाननला गाठून त्याच्यावर काठीने हल्ला चढविला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गजाजन वाघजळेचा (३९) मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कदम, एम.एम. पठाण, प्रकाश अहिर यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतकाचे वडील आकाश वाघजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी रवी धवसे याच्याविरुद्ध कलम ३0२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे व अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.पी. पाटील, जमादार बुद्धु रेघीवाले, विनोद अवगळे, विपुल शेळके, संदीप ईढोळे, चालक मिलिंद गायकवाड यांचा समावेश असलेल्या पथकाने मुख्य आरोपी रवी धवसे याला जालना येथून अवघ्या २४ तासामध्ये अटक केली.