शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

शेतकऱ्यांसाठी ‘भूमिपुत्र’चे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही ...

वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करण्यात आले; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. गेल्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला दिला गेला नाही. तो तत्काळ देण्यात यावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांची अतोनात हानी झाली. महसूल व कृषी विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यानुसार ६९६५ खातेदार शेतकऱ्यांचे ४९९८.३२ हेक्टरवरील हरबरा, कांदा बियाणे, भाजीपाला, गहू, फळपिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले. असे असताना पात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.

गेल्या वर्षांत खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. ऑनलाईन दावे दाखल केलेल्या काहीच शेतकऱ्यांना विमा कंपनीने मोबदला दिला, पंरतु बहुतांश शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरीही मदत मिळाली नाही. शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या मार्गदर्शनात धरणे अंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरू, संतोष सुर्वे, देव इंगोले, श्रीरंग नागरे, रामेश्वर बोरकर, भागवत गोटे, पवन खोंडकर, रजनीश खोंडकर, सचिन काकडे, शंकर हुंबाड, संतोष गव्हाणे, सीताराम लोखंडे, ग्यानदेव भुतेकर यांच्यासह ‘भूमिपुत्र’चे अन्य पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले.

............

फोटो - १.५३ चा मेल

ओळी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.