शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेतकऱ्यांसाठी ‘भूमिपुत्र’चे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही ...

वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करण्यात आले; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. गेल्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला दिला गेला नाही. तो तत्काळ देण्यात यावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांची अतोनात हानी झाली. महसूल व कृषी विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यानुसार ६९६५ खातेदार शेतकऱ्यांचे ४९९८.३२ हेक्टरवरील हरबरा, कांदा बियाणे, भाजीपाला, गहू, फळपिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले. असे असताना पात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.

गेल्या वर्षांत खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. ऑनलाईन दावे दाखल केलेल्या काहीच शेतकऱ्यांना विमा कंपनीने मोबदला दिला, पंरतु बहुतांश शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरीही मदत मिळाली नाही. शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या मार्गदर्शनात धरणे अंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरू, संतोष सुर्वे, देव इंगोले, श्रीरंग नागरे, रामेश्वर बोरकर, भागवत गोटे, पवन खोंडकर, रजनीश खोंडकर, सचिन काकडे, शंकर हुंबाड, संतोष गव्हाणे, सीताराम लोखंडे, ग्यानदेव भुतेकर यांच्यासह ‘भूमिपुत्र’चे अन्य पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले.

............

फोटो - १.५३ चा मेल

ओळी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.