वाशिम : सर्वांंच्या सहकार्यातून तालुक्यातील अडोळी येथे भीमजयंतीची मिरवणूक १४ एप्रिलला शांततेत पार पडली. यामुळे गतवर्षीच्या मिरवणुकीवर गालबोट लागल्याचा ठपका यावर्षी पुसल्या गेला. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रामप्रभू सोनोने, तहसीलदार आशीष बिजवल, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ठाणेदार संजय परदेसी, डॉ. अविनाश झरे, पिरिपा जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, पोलीस उपनिरीक्षक पाठक, पी.एस. खंडारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संचालन संजय खंडारे, तर प्रास्ताविक राजकुमार पडघान यांनी व आभार प्रदर्शन पंकज पडघान यांनी मानले. समता सैनिक दलाच्या पथकाचे सहकार्य लाभले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावामधून सकाळी १0 वाजता शांततेत मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शांतता, एकोपा व एकजुटीतून विकास साधावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सर्वांच्या सहकार्यातून मिरवणूक शांततेत पार पडली.
अडोळी येथे भीमजयंती मिरवणूक शांततेत
By admin | Updated: April 15, 2015 01:12 IST