शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

बनावट कागदपत्रांद्वारे घेतला जातोय कुटुंब अर्थसाहाय्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो. ...

एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो. संबंधित कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करता येतो. अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला, मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्यासंदर्भातील तलाठ्यांकडून मिळणारा दाखला, त्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला आदी जोडणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत या योजनेंतर्गत ३ कोटी १२ लाख २० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तथापि, बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, रिसोड व मंगरुळपीर तहसीलअंतर्गत ही चौकशी सुरू आहे.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

पाच वर्षांत १५५१ कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदतीसाठी अर्ज करणाऱ्या एकूण १५५१ कुटुंबांना २० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता यातील काही कुटुंबांनी बनावट किंवा चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे काय, त्याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.

----------

तीन तालुक्यांत अनुदानापेक्षा अधिक खर्च

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सहाही तालुके मिळून एकूण ३ कोटी २४ लाख ८५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ३ कोटी १२ लाख २० हजार रुपयांचे अनुदान लाभार्थी कुटुंबांना वितरित करण्यात आले असून, मंगरुळपीर, मालेगाव आणि कारंजा या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष प्राप्त अनुदानापेक्षा अधिक खर्च झाल्याचे दिसत आहे.

--------------------

कोट : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे काय, त्याची चौकशी दोन तालुक्यांत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

पाच वर्षांत योजनेंतर्गत प्राप्त रक्कम आणि खर्च

तालुका प्राप्त रक्कम खर्च

वाशिम ५३३९९६७ ४३०००००

रिसोड ४६२६००० ४४०००००

मालेगाव ५३२०००० ५९८००००

मं.पीर ६५२०००० ६६४००००

मानोरा ४८२०००० ३९६००००

कारंजा ५८६०००० ५९४००००

---------------------------------

एकूण ३२४८५९६७ ३१२२००००