शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

शेलुबाजार येथे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुुख्य पुल तोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:18 IST

मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान कारंजा आणि मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेले हे काम किमान २ ते ३ महिनेही पूर्ण होणार नसल्याने पावसाळा वेळेत सुरू झाल्यास अकोलाकडे होणारी वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाशिम जिल्ह्यातील चार महामार्गांची कामे सद्या सुरू आहेत. सर्वच कामांची गती अत्यंत संथ असल्याने सदोदित उडणारी धूळ आणि खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच पावसाळा १० ते १५ दिवसांवर येवून ठेपला असताना शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूकीसाठी बाजूलाच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु त्यात सिमेंटचे मोठे पाईप टाकणे गरजेचे असताना या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून थातूरमातूर रस्ता तयार करण्यात आला. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता पूर्णत: वाहून जाण्याची भिती असण्यासोबतच वाहतूकही कोलमडणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भविष्यातील धोके लक्षात घेता किमान पर्यायी रस्ता तरी पावसाळ्यापूर्वी मजबूत करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग