शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शेलुबाजार येथे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुुख्य पुल तोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:18 IST

मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान कारंजा आणि मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेले हे काम किमान २ ते ३ महिनेही पूर्ण होणार नसल्याने पावसाळा वेळेत सुरू झाल्यास अकोलाकडे होणारी वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाशिम जिल्ह्यातील चार महामार्गांची कामे सद्या सुरू आहेत. सर्वच कामांची गती अत्यंत संथ असल्याने सदोदित उडणारी धूळ आणि खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच पावसाळा १० ते १५ दिवसांवर येवून ठेपला असताना शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूकीसाठी बाजूलाच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु त्यात सिमेंटचे मोठे पाईप टाकणे गरजेचे असताना या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून थातूरमातूर रस्ता तयार करण्यात आला. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता पूर्णत: वाहून जाण्याची भिती असण्यासोबतच वाहतूकही कोलमडणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भविष्यातील धोके लक्षात घेता किमान पर्यायी रस्ता तरी पावसाळ्यापूर्वी मजबूत करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग