शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी सुरू झाली आहे. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची ...

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी सुरू झाली आहे. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय निविष्ठा नियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, साहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था गाडेकर यांच्यासह विविध बियाणे, खते उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बियाणे, खतांची उपलब्धता, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, खरीप पीक कर्ज वितरण, आदी बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार संबंधित कंपन्यांकडून पुरवठा होत असल्याची खात्री करावी. कृषी विभागाने सातत्याने बीजोत्पादन, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात राहून त्यांना शासनाच्या निर्देशानुसार बियाणे, खते वितरणाबाबत सूचित करावे. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच बियाणे, खतांची गुणवत्ता तपासावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कृषी विकास अधिकारी बंडगर म्हणाले, सर्व रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यातील खतांच्या वितरणाबाबतची माहिती कृषी विभागाला त्वरित उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून खतविक्रीचे संनियंत्रण करणे शक्य होईल. तसेच ‘पॉस’ मशीन कार्यान्वित असलेल्या विक्रेत्यालाच खतांचे वितरण करावे, असे त्यांनी सांगितले.

००००

कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार म्हणाले, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागामार्फत पथके तयार करण्यात आली असून, त्याद्वारे बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहे. नुकतेच मानोरा येथे पाच लक्ष ८२ हजारांचे बियाणे जप्त करण्यात आले. चढ्या दराने बियाणे, खते विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्व कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती तोटावार यांनी दिली.