शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:34 IST

- संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ ...

- संतोष वानखडेवाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ मध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्चपूर्वी पीककर्जाची वसुली व्हावी यासाठी बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सन २०१९ च्या खरीप हंगामात पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी मार्च २०२० पर्यंत पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात ‘लॉक डाऊन’ची स्थिती आहे. यामुळे शेतमालाची विक्री करणे यासह शेतकºयांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू असताना आणि लॉक डाऊनची स्थिती असतानाही बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा, असा तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला नाही तर शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. दरम्यान शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसू नये म्हणून आमदार अमित झनक यांनी २४ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकºयांची भीषण परिस्थिती विषद केली. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे संकट आणि संचारबंदीमुळे शेतकºयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी पीककर्जाचा भरणा करण्यासाठी असमर्थ असल्याने विविध बँकांचे कर्ज भरण्यास शेतकºयांना एका महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार झनक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांनी ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला तर व्याज आकारले जाणार नाही, असे शासनाचे निर्देश आहे. पीककर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्रव्यवहार नाही. आम्ही पीककर्जासाठी शेतकºयांकडे तगादा लावत नाही.- व्ही.बी. महाले, बँक निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाशिम

टॅग्स :washimवाशिमbankबँकCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी