शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’सह बँकांमध्ये ‘कॅश’चा तुटवडा!

By admin | Updated: April 13, 2017 02:12 IST

दैनंदिन व्यवहारांवर परिणाम : सर्वच बँकांचे ‘आॅल टाइम मनी’ धोरण ठरतेय कुचकामी

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे एटीएम रिकामे झाले असून, बँकांमध्येही ‘कॅश’चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रोखीने चालणाऱ्या दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम होत असून, या समस्येपुढे बँक प्रशासनही हतबल झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पुढचे तब्बल अडीच ते तीन महिने बाजारपेठेतील सर्व व्यवहार विस्कळित झाले होते. बँकांमध्ये ठराविक रकमांचाच ‘विड्रॉल’ मिळत होता. तसेच एटीएममध्येही कॅश मिळणे दुरापास्त झाले होते. ही परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच पुन्हा एकवेळ चलन तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.नोटाबंदीमुळे जेवढी कॅश बँकांमध्ये भरल्या गेली, तेवढ्या कॅशच्या बदल्यात ‘आरबीआय’ने नव्याने २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बँकांना उपलब्ध करून दिल्या; मात्र त्यापैकी बहुतांश ‘कॅश’ पुन्हा चुकीच्या पद्धतीने चलनातून गायब झाल्यानेच हा प्रश्न उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरबीआयकडून सद्य:स्थितीत सर्वच बँकांना व्यवहारासाठी पुरेसा पैसा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट आहे. जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड येथे ‘करन्सी चेस्ट’ची सुविधा असून, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ इंडियासह इतर बँकांचे ६२ एटीएम आहेत; परंतु पुरेशी रक्कम नसल्यामुळे बहुतांश एटीएम बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या बँकेच्या खात्यातून पैसेच विड्रॉल करता येऊ नये, याची खबरदारी घेतल्या गेल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. तथापि, दैनंदिन व्यवहारांकरिता सर्वच एटीएमसह बँकेतून कॅश मिळणे दुरापास्त झाल्यामुळे जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव तथा मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उद्भवलेला प्रश्न तत्काळ निकाली निघावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिरपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ नोटाबंदीनंतर पाच महिन्यांपासून बंदच!जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथे बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ असून ८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ते आजतागायत बंदच आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्येही नियमित कॅश राहत नाही. यामुळे शिरपूरसह नजिकच्या गावांमधील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना तालुकास्थळी अर्थात मालेगावला यावे लागत आहे; मात्र मालेगावमधील एटीएमही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या ५०० व हजारच्या नोटा बँकेत जमा केल्या, तेवढ्या नोटांची ‘आरबीआय’ने छपाई करून बँकांना वितरित केल्या; मात्र विड्रॉलच्या तुलनेत बँकांमध्ये डिपॉझिटचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्न पुन्हा एकवेळ निर्माण झाला आहे. सोबतच एटीएमही बंद राहत आहेत. उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी नागरिकांनी पैसा चलनात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. - व्ही.एच.नगराळे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक