शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बंजारा समाजाला एस.टी.चे आरक्षण देऊन एकाच श्रेणीत समाविष्ट करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

बंजारा समाजाने देशाच्या स्वतंत्र्यासाठी मुघल आणि ब्रिटिश राजवटीविरोधात रणशिंग फुंकले; मात्र त्याचे मोल बंजारा समाजाला चुकवावे लागले. ब्रिटिश ...

बंजारा समाजाने देशाच्या स्वतंत्र्यासाठी मुघल आणि ब्रिटिश राजवटीविरोधात रणशिंग फुंकले; मात्र त्याचे मोल बंजारा समाजाला चुकवावे लागले. ब्रिटिश राजवटीने १८७१ साली क्रिमिनल कायदा आणून बंजारा समाजाला अपराधी घोषित केल्याने बंजारा समाजाला प्रापर्टी, जमीन जायदाद सोडून जंगलात जावे लागले. भारत स्वतंत्र झाला तरी बंजारा समाजाला स्वतंत्र होण्यास ऑगस्ट १९५२ उजाडले. बंजारा समाज जंगलातील जमात आहे, हे सर्व जाणून आहेत; मात्र भारत सरकार आणि कालांतराने महाराष्ट्र सरकारदेखील बंजारा समाजाला विकासापासून किसो दूर ठेवत आहे. बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण श्रेणीत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय बंजारा विकास मिशन भारत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष २०१४ पासून राष्ट्रपती, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, भारतीय संशोधन संस्था दिल्ली, एनसीडीएनटी आयोग दिल्ली, ओबीसी आयोग दिल्ली यांच्याकडे नियमित पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारला कित्येक आदेश आणून दिलेत; मात्र महाराष्ट्र सरकारने बंजारा आरक्षणासाठी गांभीर्याने घेतले नाही, असेही राठोड यांनी म्हटले आहे.

बंजारा समाज ८ राज्यांत एस.टी. आणि एस.सी. श्रेणीत आहे. तर महाराष्ट्र राज्यात ओबीसी, व्ही.जे. मध्ये का? राष्ट्रीय बंजारा विकास मिशनने महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडे ३१ मे रोजी राजभवनात निवेदन दिले असून भारतभर बंजारा समाजाला एकाच श्रेणीत २५ उपजातीला समावेश करण्यासाठी विनंती केली आहे. यावेळी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड, राष्ट्रीय सचिव दत्तूभाऊ जाधव, प्रदेश अध्यक्ष बाबूसिंग राठोड, प्रदेश अध्यक्षा सविता चव्हाण उपस्थित होते.