शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

बाबा कोरोनाने गेले ! मेरे पास सिर्फ मॉं है !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

वाशिम : कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, ज्यांचे फक्त ...

वाशिम : कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, ज्यांचे फक्त वडील कोरोनामुळे गेले आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा पाल्यांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंब चालविणारा घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून घेतल्याने, आम्हालाही सरकारने मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयामधून समोर येत आहे.

कोरोना संसगार्मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत. कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली. मग कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यालादेखील सरकारने मदत करावी, असा सूर उमटत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे तीन मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, तर १८२ बालकांच्या आई किंवा वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

०००००००

१) कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा?

रिसोड तालुक्यातील एका गावातील एक कुटुंब. कुटुंबात पाच सदस्य. घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून नेला. वृद्ध आई, पत्नी, दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आता महिलेवर येऊन पडली आहे. दोन मुलांच्या शिक्षणाबरोबरच अन्य जबाबदाऱ्यादेखील पार पाडताना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून नेल्यामुळे शासनाने ठोस मदत करायला हवी. कुटुंब चालविणाराच गेल्यामुळे घरची चूल कशी पटवावी? असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.

...

२) ठोस आर्थिक मदत मिळावी

कोरोनामुळे आई, वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने अशा कुटुंबातील पाल्यांनादेखील सरकारने ठोस मदत करायला हवी, असे मत एका कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने याचे दु:ख, शल्य आयुष्यभर राहणार आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने अशा कुटुंबालादेखील मदत करावी.

..

३) मोलमजुरी करावी लागणार

कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने आता मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे. बाबाचे निधन झाल्याने मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण कसे मिळणार हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने अशा कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करायला हवी. शहरी भागातील चांगल्या, दर्जेदार शाळेत १२वीपर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण मिळाले तर कुटुंबाला तेवढाच आधार होईल, असे मत व्यक्त होत आहे.

०००००

तीन जणांचे आई-वडिलांचे छत्र हरवले

१) कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही किंवा दोनपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले महिला व बालकल्याण विभाग, पंचायत विभाग, महिला व बालविकास विभागाला दिले होते.

२) त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात यावे. जिल्ह्यातील तीन बालकांचे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. १८२ बालकांच्या आई किंवा बाबा यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

३) कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य केले जाणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण बाबींची पडताळणी केली जाणार आहे.

००००००

कोरोनाचे एकूण रुग्ण ४०,२७५

बरे झालेले रुग्ण ३७,८३७

उपचार सुरू असलेले १,८५१

एकूण मृत्यू ५८६

०००००००००