शासनाने राज्यातील थकित कर्जदार शेतकºयांसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. थकित कर्जदार असलेल्या लाखो शेतक-यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज या योजनेत माफही करण्यात आले. शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करतानाच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊ, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तथापि, वर्ष उलटले तरी याची अमलबजावणी शासनाने केली नाही. त्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथून नजीकच असलेल्या वाघी बु. येथील ९० टक्के शेतकरी नियमित पीक कर्ज भरणा करीत असतात. त्यामुळे शासनाने नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयाचे अनुदान तात्काळ द्यावे, अशी मागणी या शेतक-यांमार्फत बाळासाहेब वाघ यांनी केली आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:38 IST