शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जिल्हाभरात शिवारफेरीव्दारे जलसंधारणाचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:31 IST

जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासन, बीजेएसचा उपक्रम : गावकºयांचा उत्स्फूर्त सहभागलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अधिकांश गावांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’, हे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम गांभीर्याने घेवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना सहभागी करून घेत शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांबाबत प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून गावागावात शिवारफेºयांचे आयोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर तलावांमधील गाळ हटविण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाररी शैलेश हिंगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद