शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी टाळण्याचा प्रयत्न - हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:19 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाचे शनिवारी जिल्ह्यात आगमन झाले. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने मिरवणुकीविना गणराय साधेपणाने घरोघरी विराजमान झाले. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, कोणते उपक्रम राबवावे, गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. गणरायाचे आगमन झाले असून, गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व स्थानिक प्रशासनाला  करण्यात आल्या, असे मोडक यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान गर्दी होणार नाही, याबाबत प्रशासनातर्फे कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?सार्वजनिक गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून, गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाचा वॉच राहणार आहे. तेथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून पूजा, आरती व अन्य सोपस्कार पार पाडावे,  श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, अन्य सोशल मीडियाद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

गणेश विसर्जनवेळी गर्दी होणार नाही, याबाबत कोणत्या उपाययोजना आहेत?गणेश विसर्जनवेळी भाविकांची गर्दी होणार नाही यासाठी मिरवणुका काढू नये, असा आदेश दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कृत्रिम तलावांची निर्मिती करतील. गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी गणरायांच्या मूर्ती या नगर पालिका, नगर पंचायतच्या संबंधित प्रतिनिधींकडे सुपूर्द कराव्या. सर्वांच्यावतीने नगर पालिका किंवा स्थानिक प्रशासन हे मूर्तिंचा मान, सन्मान ठेवून विसर्जन करतील. घरगुती गणेशांचे विसर्जन शक्यतोवर घरीच करावे. हे शक्य नसेल तर नगर परिषदांनी घरगुती गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली असेल तर तेथे भाविकांनी गणेश मूर्ती सुपूर्द कराव्या. यामुळे गणेश विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळता येईल.

प्रतिबंधित क्षेत्रात गणेश मंडळांना परवानगी आहे का? कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) गणेश मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली नाही. गणेश मंडळातर्फे श्रीगणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर एखाद्या भागात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्ण सापडल्यास, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र संबंधातील सर्व नियम काटेकोरपणे लागू केले जातील. गणेशोत्सवादरम्यान आरोग्यविषयक जनजागृती करावी. कोरोनाविषयक संदेशाचे पोस्टर लावून नागरिकांनी दक्षता कशी घ्यावी, याचे देखावे ठेवावे. याशिवाय मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. कोरोनाच्या परिस्थितीत रक्ताची गरज असल्याने गणेश मंडळांनी सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. अधिकाधिक रक्तदात्यांनी समोर यावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतGanesh Mahotsavगणेशोत्सव