शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

आसोला खु. परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:23 IST

शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात झाडे लावून जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या संगोपनावर कोट्यवधींचा खर्च केला. पर्यावरणाचे ...

शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात झाडे लावून जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या संगोपनावर कोट्यवधींचा खर्च केला. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असताना आसोला खु. परिसरातील जंगलातून जिवंत झाडांची कत्तल करून त्याची राजरोस ट्रॅकद्वारे वाहतूक केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला अल्प देऊन विना परवानगी मोठमोठ्या झाडांची कत्तलही केली जात असल्याचे दिसत आहे. हा प्रकार सर्रास सुरू असतानाही मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मात्र याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. शासकीय सुटीच्या दिवशी जंगलातील जिवंत झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात आसोला खुर्द या परिसरात केली जात आहे. आसोला खु. ते गव्हा रस्त्यावरील शेकडो वृक्षाचा कत्तल करण्यात आल्याचे दिसत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन अवैध वृक्ष तोडील लगाम लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमी कडून होत आहे.

--------------

कोट: जंगलातील वृक्षांची अवैध कत्तल होत असल्याची तक्रार अद्याप आमच्याकडे कोणाकडून करण्यात आली नाही. जनतेने तातडीने या प्रकाराची माहिती देऊन वन विभागाला सहकार्य करायला हवे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नसून, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाहणी करून तपास करण्याच्या सूचना देण्यात येतील.

- सुमंत सोळंके,

उपवनसंरक्षक, वाशिम (प्रादेशिक)