शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावातील जनतेला १४ दिवसांत एकदा होतो पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:05 IST

अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअल्प जलसाठा व भारनियमनाचा परिणामविहिरी, कूपनलिकांची पातळी गेली खोल 

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): यंदाच्या अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तीन प्रभागातील जनतेला तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खोल गेल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. आसेगाव येथे तीन प्रभागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी १४ पाईप लाईन आहेत. यातील एका लाईनमधून पाणी सोडल्यास दुसºया लाईनमधून पाणी पुरवठा करण्यासाठी १४ दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरी आणि कूपनलिका, हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी होत आहेत. यंदा अपुरा पाऊस पडल्याने जलसाठे आटले आहेत. त्यातच महावितरणकडून १४ तास भारनियमन करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा योजनेतही अडथळे येत आहेत. एका हातपंपावर ४० ते ५० कुटंबांची भांडी ओळीने पाणी भरण्यासाठी लावून ठेवावी लागतात. त्यात हातपंपात साचलेले पाणी संपले की पुन्हा पाणी साचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने नियोजन करून जनतेला पाणी पुरवठा करावा आणि महावितरणनेही भारनियमन शिथील करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. 

टॅग्स :Waterपाणी