शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

आसेगावातील जनतेला १४ दिवसांत एकदा होतो पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:05 IST

अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअल्प जलसाठा व भारनियमनाचा परिणामविहिरी, कूपनलिकांची पातळी गेली खोल 

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): यंदाच्या अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तीन प्रभागातील जनतेला तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खोल गेल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. आसेगाव येथे तीन प्रभागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी १४ पाईप लाईन आहेत. यातील एका लाईनमधून पाणी सोडल्यास दुसºया लाईनमधून पाणी पुरवठा करण्यासाठी १४ दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरी आणि कूपनलिका, हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी होत आहेत. यंदा अपुरा पाऊस पडल्याने जलसाठे आटले आहेत. त्यातच महावितरणकडून १४ तास भारनियमन करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा योजनेतही अडथळे येत आहेत. एका हातपंपावर ४० ते ५० कुटंबांची भांडी ओळीने पाणी भरण्यासाठी लावून ठेवावी लागतात. त्यात हातपंपात साचलेले पाणी संपले की पुन्हा पाणी साचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने नियोजन करून जनतेला पाणी पुरवठा करावा आणि महावितरणनेही भारनियमन शिथील करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. 

टॅग्स :Waterपाणी