शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:22 IST

उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या अरूणावती नदीत परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला; मात्र गेट बंद न केल्याने हे पाणी वाहून जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात छायाचित्रासह प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघूसिंचन विभागाने पाणी अडविण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.अरूणावती नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी गेट देखील आहेत. पावसाळ्यानंतर नदीपात्रात असणारे पाणी उन्हाळ्यात शेतीकरिता तसेच जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी बंधाºयाला गेट लावून पाणी अडविले जाते. यावर्षी मात्र नदीपात्रातील पाणी अडविण्यास विलंब झाला. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंंबरच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करून पाणी अडविण्यास सुरूवात केली.तालुक्यातील साखरडोह, जवळा, हिवरा बु., कोंडोली, धामणी, मानोरा, रामतिर्थ, कारखेडा आदी नदीकाठच्या गावात कोल्हापूरी बंधारे असून पाणी अडविले जात असल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम