शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार; पाणीटंचाईचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत.

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे.गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड झाली होती. प्रशासनानेही शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. त्यातच प्रशासनानेही शेतकºयांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही मानोरा, वाशिम आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच प्रकल्पांत अल्प जलसाठा उरला आणि भूगर्भातील पाणी पातळीवरही अल्प पावसाचा परिणाम झाला. अल्प पावसामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे हरभºयाच्या काढणीतून दिसत आहे. अशात उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि तिळासह गतवर्षात वाढलेली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची  पेरणी किंवा लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत गतवर्षी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अर्थात गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकºयांनी हे धाडस केले होते. तथापि, यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटण्याची भिती कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रकल्पातील साठा आरक्षीत करण्यासह विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले असून, शेतकºयांना उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती