शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार; पाणीटंचाईचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत.

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे.गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड झाली होती. प्रशासनानेही शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. त्यातच प्रशासनानेही शेतकºयांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही मानोरा, वाशिम आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच प्रकल्पांत अल्प जलसाठा उरला आणि भूगर्भातील पाणी पातळीवरही अल्प पावसाचा परिणाम झाला. अल्प पावसामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे हरभºयाच्या काढणीतून दिसत आहे. अशात उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि तिळासह गतवर्षात वाढलेली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची  पेरणी किंवा लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत गतवर्षी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अर्थात गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकºयांनी हे धाडस केले होते. तथापि, यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटण्याची भिती कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रकल्पातील साठा आरक्षीत करण्यासह विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले असून, शेतकºयांना उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती