शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार; पाणीटंचाईचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत.

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे.गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड झाली होती. प्रशासनानेही शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. त्यातच प्रशासनानेही शेतकºयांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही मानोरा, वाशिम आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच प्रकल्पांत अल्प जलसाठा उरला आणि भूगर्भातील पाणी पातळीवरही अल्प पावसाचा परिणाम झाला. अल्प पावसामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे हरभºयाच्या काढणीतून दिसत आहे. अशात उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि तिळासह गतवर्षात वाढलेली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची  पेरणी किंवा लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत गतवर्षी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अर्थात गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकºयांनी हे धाडस केले होते. तथापि, यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटण्याची भिती कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रकल्पातील साठा आरक्षीत करण्यासह विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले असून, शेतकºयांना उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती