शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के जमीन संपादित करा! -समृद्धी महामार्गाबाबत शासनाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:05 IST

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या  भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती.३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर देण्यात आले आहेत.

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या  भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विविध स्वरूपातील अडचणीत सापडलेल्या जमिनींचा अपवाद वगळता किमान ८० टक्के भुसंपादन येत्या ३१ मार्च २०१८ च्या आत करण्यात यावे, असे निर्देश शासनाने स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, अधिकारी, कर्मचारी जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यानुषंगाने तालुका उपनिबंधक कार्यालयांवर शेतकºयांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. दरम्यान, शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देवून सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित करण्याचा निर्धार केल्याने शेतकºयांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती. आगामी सहा दिवसांत हे प्रमाण वाढवून ३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकामी जोमाने भिडल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग