शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी

By admin | Updated: January 1, 2015 01:36 IST

वाशिम जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये राबवल्या जाणार ६0१ उपाययोजना ; ९३ गावांत टँकरने पाणी.

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार जानेवारी ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामाचा या आराखड्यात समावेश असून, त्यासाठी ५४ लाख ५0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असून, त्यावर १ कोटी ४१ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ७१ गावांमध्ये ८१ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार असून, त्यासाठी ४८ लाख ६0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असून, ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार आहेत. वाशिम तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील १६, मानोरा तालुक्यातील १५ व कारंजा तालुक्यातील १७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील ३९१ गावांतील ७४१ हातपंप दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीतून ५९ लाख २८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.